• Sat. Jun 6th, 2026
    मुंबईत 16 मार्गांवर धावणार ‘जल मेट्रो’, पहिली बोट शहरात दाखल; दोन मार्गांवर सेवा सुरू होणार

    Candela P12 Ferry: महामुंबईत जल मेट्रोच्या विकासासाठी वेगाने काम सुरू असून पहिली बोट मुंबईत दाखल झाली आहे. यानंतर शहरातील 21 जल मार्ग आणि नवे 11 जल मार्गांचा विकास होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईत जल मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो मुंबईत दाखल झाली आहे. कॅन्डेला पी-12 इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी पहिली बोट जलविमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. शहरातील जलवाहतुकीच्या विस्ताराच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. 27 मे रोजी दाखल झालेली ही बोट जवाहरलाल नेहरू बंदरात (JNPT) आहे. ही कस्टम क्लिअरन्सच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिली आहे.

    चाचणीनंतर मेट्रो सेवेत

    मुंबई महानगर प्रदेशात सध्या जल मेट्रोचं जाळं विस्तारणार आहे. देशात डिसेंबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात जल मेट्रोची वाहतूक सुरू होईल अशी घोषणा केली होती. त्यासाठीच आता हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कस्टम क्लिअरन्स मिळताच कॅन्डेलाची चाचणी केली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल. वाहत्या पाण्यातही या बोटमधून सुरक्षितपणे प्रवास करणं शक्य असल्याचा दावा विक्रेत्याने केला आहे. पण मान्सून तोंडावर असल्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी या चाचण्या गरजेच्या आहेत.

    मुंबईतील जल मेट्रो प्रकल्पासाठी एकूण 11 कॅन्डेला पी12 फेरी मागवल्या आहेत. या हाय-स्पीड इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल फेरीमधून ताशी 40 किमी वेगाने प्रवास करता येतो. एका वेळी या बोटीत 30 प्रवासी प्रवास करू शकतात. या फेरी सर्वप्रथम दोन मार्गांवर प्रवास करतील. पहिला मार्ग गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग असा असेल. पुढील मार्ग मांडवा ते वर्सोवा-मढ असा असेल. मुंबई महानगर प्रदेशात जलवाहतुकीचे व्यापक जाळे विकसित करण्याच्या राज्य सरकाच्या योजनेचा हा एक भाग आहे.

    शहरात जल मेट्रोचं जाळं

    मुंबईत जल मेट्रोचं 340 किमी लांब जाळं तयार करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट आहे. यासाठी 6,500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याअंतर्गत महामुंबईत आधुनिक जलमार्ग, टर्मिनस आणि इलेक्ट्रिक फेरींचा विस्तार होणार आहे. मुंबईसारख्या वाहतूक कोंडी आणि लोकलमधील गर्दी असलेल्या शहरांमधील वाहतूक सुरळीत होणार आहे.

    या प्रकल्पात मुंबईमधील 125 किलोमीटर लांब 21 मार्ग आणि 20 स्थानकांचा विकास होणार आहे. त्याशिवाय 215 किलोमीटर लांब नवे 16 जलमार्ग आणि 24 स्थानकंही उभारण्यात येतील. या प्रकल्पासाठी 3,436 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 3,156 कोटी रुपये 201 इलेक्ट्रिक आणि हायब्रिड फेरी घेण्यासाठी खर्चले जातील.

    Maharashtra TimesHydrogen Train: जर्मनीत ट्रेन बंद होण्याच्या मार्गावर, जपानमध्ये प्रयोग सुरुच; तरी भारतात सर्वात लांब ‘हायड्रोजन ट्रेन’ला मंजुरी

    18 शहरात जल मेट्रो

    भारतातील 18 नव्या शहरांमध्ये जल मेट्रो सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात श्रीनगर, पाटणा, वाराणसी, अयोध्या आणि प्रयागराजमध्ये मेट्रो सेवा सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आसाममधील तेजपूर आणि दिब्रुग-डला शहरांना जल मेट्रो मिळणार आहे. कोटी जल मेट्रोच्या यशानंगर या सर्व शहरांमध्ये विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा