HSRP Number Plate Deadline : गेल्या वर्षी, एचएसआरपी लावण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून आणि १५ ऑगस्ट तसेच ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर अशा पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : तब्बल पाच वेळा मुदतवाढ मिळाल्यानंतर जुन्या वाहनांना अखेर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात ‘एचएसआरपी’ १ जुलैपासून अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जुन्या वाहनधारकांनी ३० जूनपूर्वी ‘एचएसआरपी’ बसवून घ्यावी. १ जुलैपासून एचएसआरपी नसलेल्या वाहनांना एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत पाचवेळा निर्णयाला मुदतवाढ मिळाली आहे, परंतु वाहन चालक-मालक संघटनांनी सक्ती करण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पाच वेळा मुदतवाढ, 1 जुलैपासून HSRP अनिवार्य
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना एचएसआरपी लावणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत नव्या वाहनांना एचएसआरपी लावूनच रस्त्यावर येत आहेत. सरकारकडून एचएसआरपी तपासणी सुरू न झाल्याने वाहनधारकांनी देखील एचएसआरपी बसवण्याकडे पाठ फिरवली होती. आता सक्तीची तारीख निश्चित झाल्याने पुन्हा एकदा एचएसआरपीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी गेल्या वर्षी, एचएसआरपी लावण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून आणि १५ ऑगस्ट तसेच ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर अशा पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. Prateek Yadav : मुलींच्या सहवासाची आस, घरी जाण्याची ओढ; डॉक्टरी सल्ल्याविरुद्ध डिस्चार्ज घेतला, प्रतीक यादवसोबत 12 दिवसात काय घडलं?
एक हजार रुपयांचा दंड
‘एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. ऑनलाइन पद्धतीने एचएसआरपी आरक्षित करता येते. त्यामुळे वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत तातडीने एचएसआरपी बसवून घ्यावी,’ असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
Rupali Chakankar | भोंदूबाबा अशोक खरातसोबतच्या गुवाहाटी फोटोचं चाकणकरांकडून स्पष्टीकरण
Petrol Diesel Price : देशभरात इंधन दरवाढीचा धक्का, मुंबईत पेट्रोलची किंमत तब्बल 3.14 रुपयांनी वाढली, सर्वाधिक भाववाढ कोकणात
वाहन चालक-मालक संघटनांची नाराजी
सरकारने एचएसआरपी सक्तीच्या निर्णयावर वाहन चालक-मालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्वप्रथम एचएसआरपीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवणे गरजेचे आहे. पाटीचा दर्जा अतिशय खराब असणे, एक पाटी तुटल्यास किंवा खराब झाल्यास दोन्ही पाटी विकत घेणे असा भुर्दंड वाहनचालकांना सहन करावा लागतो. या आणि अन्य त्रुटी दूर कराव्यात, त्यानंतर सक्ती करून दंड आकारणी करावी, अशी प्रतिक्रिया राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा