Mumbai Plastic Pollution: महापालिकेने गेल्या आठ वर्षांत २९ लाख १२ हजार १५६ आस्थापनांची तपासणी केली. तरीही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
जून २०१८ ते मार्च २०२६ या कालावधीत महापालिकेने तब्बल १ लाख १९ हजार ४३७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले असून, १८ हजार ४०८ प्रकरणांत ९ कोटी २१ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. फेरीवाले, दुकानदार, व्यापारी आणि ग्राहकांकडूनही सर्रास प्लास्टिकचा वापर होत असल्याने महापालिकेची कारवाई अपुरी ठरत आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. पावसाळ्यात नाले आणि जलवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबण्यामागे प्लास्टिक हे प्रमुख कारण मानले जाते.
Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिल महिन्याचा हफ्ता रखडला, eKYC करुनही खात्यात पैसे नाही, लाडक्या बहिणी प्रतीक्षेत; कधी मिळणार पैसे?
महापालिकेकडून वेळोवेळी विशेष मोहिमा राबवून कारवाई केली जाते. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवणूक, वितरण किंवा विक्री करणाऱ्यांवर पहिल्या गुन्ह्यासाठी पाच हजार, दुसऱ्यासाठी दहा हजार आणि तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. तसेच, तीन महिन्यांच्या कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. मात्र, या कठोर नियमांनंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. आता येत्या काही दिवसांत बाजारपेठांमध्ये विशेष मोहीम राबविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे.
Mumbai Crime: पुणेकर तरुणीने VC करुन मुंबईत संपवलं जीवन; माऊलीचा जीवघेणा आक्रोश, बाप हसत टाळ्या वाजवत होता
केंद्राची अधिसूचना;
तरीही वापर सुरूच
केंद्र सरकारने १२ ऑगस्ट २०२१ रोजी ‘ एकलवापर प्लास्टिक अधिसूचना २०२१ ’ जाहीर केली. त्याआधी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र प्लास्टिक व थर्मोकोल अधिसूचना २०१८’ लागू केली होती. या नियमांनुसार विविध प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री, वाहतूक, साठवण आणि वापरावर बंदी आहे. मात्र, नियम आणि दंडात्मक कारवाई असूनही मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर अद्यापही खुलेआम सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.
वर्षभरातच ७,६८१ किलो प्लास्टिक जप्त
एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या एका वर्षात महापालिकेने १ लाख २५ हजार ३७८ ठिकाणी तपासण्या केल्या. या कारवाईत सात हजार ६८१ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, २ हजार ३४९ प्रकरणांत १ कोटी १८ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
… या ठिकाणी महापालिकेची करडी नजर
मुंबईतील मलबार हिल, गिरगाव, ग्रँट रोड, परळ, चेंबूर, भांडुप पश्चिम, मुलुंड, कुर्ला, सांताक्रूझ पूर्व, दहिसर या भागांत प्लास्टिकचा वापर अधिक प्रमाणात आढळून आला आहे. त्यामुळे तेथे विशेष कारवाया केल्या जात आहेत.
