• Sat. Jun 6th, 2026
    Heat Wave : विदर्भात उन्हाचं ‘तांडव’! अकोल्यात तरुण शेतमजुर दगावला; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट

    Heat Wave Akola : सध्या उन्हाचा पारा सर्वत्र वाढला आहे. अनेक ठिकाणी जीवाची लाहीलाही होते आहे. महाराष्ट्रातलं अकोला हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. आता याबद्दलची मोठी घडामोड समोर आली आहे. अकोल्यात एका तरुण शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अकोला : विदर्भात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून भीषण उष्णतेच्या लाटेने संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पार गेल्याने अकोला जिल्ह्यात एका ३० वर्षीय तरुण शेतमजुराचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शिरसोली येथील श्याम इंगळे हे शेतात काम करत असताना त्यांना उष्णतेचा तीव्र फटका बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. विदर्भात उष्माघाताच्या रुग्णांचा आकडा आता ३५० च्या पार पोहोचला असून, एकट्या अकोला जिल्ह्यात ३२३ रुग्णांची नोंद झाली आहे.

    प्रशासन ‘अलर्ट मोड’वर

    या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे ‘अलर्ट मोड’वर आले असून अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने उपचार कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

    अमरावती जिल्ह्यातली स्थिती काय?

    दुसरीकडे अकोल्यासोबतच अमरावती जिल्ह्यातही १० रुग्ण आढळले असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने कडक नियमावली (SOP) जाहीर केली आहे. अकोला शहरात नागरिकांना भर उन्हात थांबावे लागू नये म्हणून दुपारी १२ ते ५ या वेळेत ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयांमध्ये १३० हून अधिक खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून डॉक्टरांची पथके २४ तास तैनात आहेत.

    Maharashtra TimesSatara Politics : साताऱ्याच्या राजकारणात भुवया उंचावणाऱ्या घडामोडी, आजी-माजी पालकमंत्री एकाच मंचावर; झेडपी राड्यानंतर चित्र बदललं

    प्रशासनाचे आवाहन

    दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानाचा पारा ४८ अंशांपर्यंत जाण्याचा इशारा दिला असल्याने, नागरिकांनी दुपारी १२ ते ५ या वेळेत घराबाहेर पडू नये, सुती कपड्यांचा वापर करावा आणि तहान नसली तरी भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    लाट अधिक तीव्र होणार

    दरम्यान, वाढत्या उन्हामुळे शेतमजुरांच्या कामाच्या वेळाही बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, विदर्भातील ही उष्णतेची लाट येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. गेली तीन वर्षे पत्रकार म्हणून त्यांनी प्रत्यक्षपणे काम केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये (मुंबई) इंटर्न म्हणून पत्रकारिता सुरू केली.

    मेन डेस्क
    इंटर्न म्हणून रुजू झाल्यानंतर संबंधित संपादकांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली. सहा महिने मेन डेस्कसाठी सर्व बीटच्या बातम्यांचे काम केले.

    फोटोगॅलरी, वेबस्टोरी
    तिथंच त्यांना फोटोगॅलरी आणि वेबस्टोरी या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करत त्यांनी अतिशय दर्जेदार काम केले. लोकसत्तामध्ये काम करताना, राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयावर सातत्याने बातम्यांचे लिखाण केल्याने त्यातील आवड खूप वाढली.

    शिक्षण
    सुनिल यांनी पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी बीए आणि एमएपर्यंतच शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पूर्ण केले आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी स्थानिक वृत्तपत्रांसाठी शैक्षणिक बीट सांभाळत बातम्या लिहल्या.

    जाहिरात क्षेत्रात काम
    याशिवाय सुनिल यांना फोटोग्राफी, व्हिडिओ संपादन, ग्राफिक्स डिझाइनचीही आवड आहे. या आवडीला जोपासण्यासाठी त्यांनी पत्रकारिता विभागाशी संबंधित असलेल्या जाहिरात या क्षेत्रात काम केले आहे. ही काम त्यांनी स्वतःच्या आनंदासाठी केले. ज्यातून त्यांचा मोठा जनसंपर्क वाढला. काही पैसेही मिळवता आले.

    दिग्दर्शन, संगीत
    कॉलेज जीवनात त्यांनी तीन लघुपट बनवले, ज्याचे कॅमेरा, पटकथा आणि दिग्दर्शनही त्यांनी स्वतःच केले आहे. त्यांना संगीत क्षेत्रातही खास रस आहे. काव्यलेखन, गीत लेखन, सादरीकरण केलेले त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झालेले आहेत.

    पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित
    दरम्यान, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये संधी मिळाल्यानंतर हायपर लोकल बातम्यांचे काम करण्याचा अनुभव मिळाला. ज्यामध्ये क्राइमसह विविध महत्वाच्या आणि मोठ्या बातम्या लिहायचेही तंत्र त्यांनी विकसित केले. मटा ऑनलाईनमध्ये काम करताना सुनिल यांची पत्रकारिता क्षेत्रातील उत्कंठा, उत्साह द्विगुणित झाला आहे, कारण इथेही सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संपादकांचे, वरिष्ठांचे, शिफ्ट इन्चार्ज यांचे अनमोल मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहते. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने पत्रकार म्हणून घडण्याची आणखी एक खूप मोठी सुवर्णसंधी दिल्याचे सुनिल मानतात.… आणखी वाचा