राज्यात कृषी निविष्टा खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. केवळ धाराशिव जिल्ह्यातच २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करत राज्यभरात याची व्याप्ती अधिक मोठी असू शकते, असा आरोपही त्यांनी केला.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. मात्र अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले.