• Wed. Jun 10th, 2026

    Pune-Mumbai Expressway: ‘मिसिंग लिंक’नंतर MSRDCचा गेमचेंजर प्लॅन! ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ दहा पदरी होणार; भूसंपादन प्रक्रिया सुरू

    Pune-Mumbai Expressway: ‘मिसिंग लिंक’नंतर MSRDCचा गेमचेंजर प्लॅन! ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’ दहा पदरी होणार; भूसंपादन प्रक्रिया सुरू

    Pune-Mumbai Expressway Traffic: वीकेंड आला की मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी होते. नव्या मिसिंग लिंकमुळे ही कोंडी बायपास करून प्रवास करता येणार असतानाच एमएसआरडीसी अजून एका प्रकल्पाचं काम सुरू करणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकचं आज लोकार्पण झालं. 1 मेपासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला असून मुंबई ते पुणे प्रवास आता सुस्साट होणार आहे. पण या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे याची दखल घेऊन मिसिंग लिंक पाठोपाठ आता आणखी एका प्रकल्पाचं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाळाने हाती घेतलं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग सध्या सहा पदरी असून त्याला दहा पदरी करण्याचं काम करणार आहे. यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी इतिहासजमा होणार आहे.

    खालापूर टोल नाक्याजवळ कोंडी

    खोपोली ते कुसगावदरम्यान 13.3 किमी मिसिंग लिंकचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 1 मे रोजी लोकार्पण झालं. लोणावळा-खंडाळा घाटातील कोंडी बायपास करून मुंबई-पुणे प्रवास यामुळे सुलभ होणार आहे. दररोज या महामार्गावरू तब्बल 1.5 वाहनांचा प्रवास होते. वीकेंडला ही संख्या आणखी वाढते. शुक्रवारीच लॉन्ग वीकेंड आणि मिसिंग लिंकच्या उद्घाटनासाठी एक लेन बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल 8 तास प्रवासी खालापूर टोल नाक्याजवळ अडकले होते.Maharashtra TimesMumbai-Pune Missing Link: देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावर भव्य प्रकल्प, ‘मिसिंग लिंक’ म्हणजे नेमकं काय? मार्गाची वैशिष्ट्येही आहेत अनेक

    दोन दशकांपूर्वी एक्सप्रेस वे सुरू

    2002मध्ये 94.6 किमी लांब मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची सुरूवात झाली होती. हा देशातील सर्वात पहिला द्रुतगती महामार्ग आहे. तेव्हापासून दोन दशकांमध्ये खासगी वाहनांची संख्या वाढली असून वाहतूक कोंडी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे प्रवासात वेळ वाढतो. या समस्येवर मिसिंग लिंकचा तोडगा निघाला होता. नवीन मार्ग आठ पदरी असून जुना द्रुतगती महामार्ग सहा पदरीच आहे. यामुळे भविष्यात होणारी कोंडी टाळण्यासाठी हा महामार्गसुद्धा दहा पदरी करणं आवश्यक ठरणार आहे.

    त्यासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामकाजही हळूहळी वाढत आहे. त्यामुळे एक्सप्रेसवेवरून या विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांची संख्या वाढणार आहे. खासगी वाहनांची संख्या यामुळे वाढणार आहे. त्यामुळे महामार्गचं रुंदीकरण गरजेचं आहे.

    कसा असेल दहा पदरी मार्ग?

    या संपूर्ण प्रकल्पासाठी 5,000 कोटी रुपयांचा खर्च येणं अपेक्षित आहे. सध्या एक्सप्रेसवेच्या बाजूने 100 हेक्टर जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या जमीन संपादनात कोणताही अडथळा येणार नसल्याची अधिकाऱ्यांची आशा आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होताच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचं दहा पदरीकरण सुरू होणार आहे.

    Maharashtra TimesKhambatki Ghat Tunnel: नव्या बोगद्याने 5-10 मिनिटांत ओलांडा खंबाटकी घाट! धोकादायक वळणांतून सुटका; पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा

    एक्सप्रेस वेची गरज का होती?

    मुंबई आणि पुण्याला जोडणारा दोन पदरी राष्ट्रीय महामार्ग -4 प्रवाशांना अपुरा पडत होता. तसेच, हा 192 किमी लांब रस्ता डोंगराळ भागातून जात असल्यामुळे प्रवासात वेळ जायचा. या नंतर 94 किमी लांब स्वतंत्र एक्सप्रेसवे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अवघ्या 27 महिन्यांत हा सहा पदरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात आला. या मार्गावर 17 व्हायाडक्ट, 26 अंडरपास, दोन रेल्वे ओव्हर ब्रिज आणि एका 5.7 किमी लांब बोगद्याचा समावेश होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गसुद्धा चौपदरी करण्यात आला.

    सहा पदरी द्रुतगती महामार्ग आणि चौपदरी राष्ट्रीय महामार्ग खालापूर टोलनाक्याजवळ एकत्र येऊन ते खंडाळा एक्झिटजवळ जाऊन वेगळे होतात. या दहा पदरी रस्त्यावरील वाहतूक पुढे आडोशी बोगद्यापासून खंडाळ्याबाहेर एका 6 किमी अरुंद मार्गावर पोहोचते. त्यामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण होते.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा