• Tue. Jun 16th, 2026

    Sunetra Pawar : ‘विकासाचा पाया साहेबांनी रचला आणि दादांनी त्यावर कळस चढवला’; सांगता सभेत सुनेत्रा पवारांकडून शरद पवारांचा उल्लेख

    Sunetra Pawar : ‘विकासाचा पाया साहेबांनी रचला आणि दादांनी त्यावर कळस चढवला’; सांगता सभेत सुनेत्रा पवारांकडून शरद पवारांचा उल्लेख

    सुनेत्रा पवार यांनी बारामतीच्या सांगता सभेत शरद पवारांचा गौरव केला. अजितदादांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना नातं जपण्याची भावनिक साद घातली आहे.

    ‘विकासाचा पाया साहेबांनी रचला आणि दादांनी त्यावर कळस चढवला’; सांगता सभेत सुनेत्रा पवारांकडून शरद पवारांचा गौरव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणारी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आज प्रचाराची सांगता सभा पार पडली. या ऐतिहासिक सभेत बोलताना सुनेत्रा पवार यांनी, “आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आमच्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत,” असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे.

    अजितदादांच्या निधनानंतर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून सावरत सुनेत्रा पवार यांनी केवळ कुटुंबाचीच नव्हे, तर राज्याची जबाबदारीही समर्थपणे पेलली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची धुराही आपल्या खांद्यावर घेतली. आता स्वतः उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा केलेला उल्लेख राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

    शरद पवार , सुप्रिया सुळेंचे आभार

    “अजित दादांना सर्वप्रथम मनापासून वंदन करते. आपल्याला सर्वांना माहिती आहे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल सुरुवातीलाच मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. आदरणीय पवार साहेब व सौ सुप्रियाताई यांचे मी विशेष आभार मानते. तसेच ज्या ज्या संस्था संघटनांनी मला उस्फूर्तपणे जाहीर पाठिंबा दिला आहे, त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते. हा पाठिंबा म्हणजे बारामतीच्या भवितव्याबद्दलची एकत्रित बांधील आहे, असं मी मानते,” असं पवार यावेळी म्हणाल्या.

    Maharashtra TimesSupriya Sule : ‘हा दिवस येईल वाटलं नव्हतं, वहिनींना साथ द्या, दादाला…’; बारामतीतील प्रचार सभेत सुप्रिया सुळेंचा कंठ दाटला

    “तुमच्याकडे नातं टिकवायला आलेली आहे”

    आज मी इथे उभी आहे महायुतीचा उमेदवार म्हणून फक्त उमेदवार म्हणूनच नाही. तर एक अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची जबाबदारी घेऊन. दादा गेले पण त्यांची स्वप्न अजून जिवंत आहेत. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज रणांगणामध्ये उतरलेली आहे. हो ही लढाई सोपी नाही. पण मी एकटी नाही कारण मला विश्वास आहे माझ्या मागे तुम्हा सर्व बारामतीकरांची ताकद उभी आहे. ही माती माझी आहे, तुम्ही माणसं माझी आहात आणि तुमचा विकास हाच दादांप्रमाणे माझाही ध्यास आहे. आज मी तुमच्याकडे केवळ मत मागायला इथे उभी राहिलेली नाही मी तुमच्याकडे नात टिकवायला आलेली आहे.

    शारदाबाई पवारांचे स्मरण

    “आज या मंचावर एका व्यक्तीचे आवर्जून स्मरण करणे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यांनी पवार कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय वारशाची पायाभरणी केली, त्या अजितदादांच्या आजी आदरणीय शारदाबाई पवार यांचे. त्यांनी सून म्हणून केवळ पवारांचे कुटुंब सांभाळले नाही, तर त्यांनी संस्कार, नीतीमूल्ये आणि संघर्षाची भक्कम परंपरा निर्माण केली. यामधूनच पुढे विविध क्षेत्रांतील मोठी नेतृत्वे घडत गेली. त्या केवळ कुटुंबापुरत्याच मर्यादित न राहता, त्यांनी समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडीत मोलाचा वाटा उचलला”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

    “पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे”

    पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “आदरणीय पवार साहेबांच्या दूरदृष्टीमधून आपण बारामतीच्या विकासाचा पाया रचला आणि खऱ्या अर्थाने आदरणीय अजितदादांनी अपार कष्टाने त्यावर कळस चढवला. आदरणीय पवार साहेबांचे आशीर्वाद आपल्यासाठी अत्यंत मोलाचे आहेत; तसेच आमच्या आई श्रीमती आशाताई अनंतराव पवार यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, हा आमच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे.”

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा