Bhendwal Ghatmandani 2026 : ३५० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भविष्य जाहीर झाले आहे. यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहणार असला तरी संरक्षणाबाबत चिंतेचे संकेत आहेत. पाऊस आणि पिकांची स्थिती कशी असेल? याबाबतचं भाकितही समोर आलं आहे.
राजकीय भाकित: ‘राजा’ची खुर्ची सुरक्षित, पण संघर्षाचे सावट
घटमांडणीतून निघालेल्या निष्कर्षानुसार, देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान आपल्या पदावर कायम राहतील. मात्र, आगामी काळात ते मोठ्या मानसिक किंवा राजकीय तणावाखाली असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच, देशाची आर्थिक स्थिती फारशी मजबूत राहणार नाही, असेही संकेत या विधीतून मिळाले आहेत.
देशाची सुरक्षा आणि जागतिक तणाव
बदलत्या हवामानासोबतच सध्याच्या जागतिक परिस्थितीचे प्रतिबिंबही या घटमांडणीत उमटले आहे.
संरक्षण व्यवस्था: देशाची संरक्षण स्थिती कमकुवत राहण्याची चिन्हे असून संरक्षण खात्यावर मोठा ताण असेल.
आंतरराष्ट्रीय पडसाद: इराण-अमेरिका तणावासारख्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सीमावर्ती भागात तणाव वाढू शकतो.
पाऊसमान: जूनमध्ये दमदार सुरुवात, पण महापुराचा धोका
Dombivli Local Train Derailment Update : डोंबिवलीमध्ये लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल
पावसाबाबत संमिश्र अंदाज वर्तवण्यात आला आहे
जून: सुरुवातीला पावसाचा जोर भरपूर राहील.
जुलै: पाऊस सर्वसाधारण असेल.
ऑगस्ट आणि सप्टेंबर: पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
इशारा: पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक भागात महापुराचा धोका निर्माण होऊन पिकांचे नुकसान होऊ शकते.
पीक परिस्थिती: कापूस-तीळ जोमात, पण रोगराईचे संकट
यंदा पिकांवर रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याने शेतकऱ्यांसाठी हे वर्ष आव्हानात्मक ठरू शकते, असा अंदाज भेंडवळने वर्तवला आहे.
भरघोस पिके: कापूस, तांदूळ, तीळ आणि बाजरीचे उत्पादन भरपूर होईल आणि त्यांना भावही चांगला मिळेल.
मध्यम पिके: ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस आणि वाटाणा ही पिके सर्वसाधारण राहतील.
३५० वर्षांची अखंड परंपरा
पूर्णा नदीकाठी होणारी ही घटमांडणी निसर्गाच्या लहरीपणाचा अंदाज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आशेचा किरण मानली जाते. चंद्रभान महाराज यांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने पाळली जाते. बदलत्या हवामानाच्या काळातही या पारंपरिक अंदाजांकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.
