Nana Patole : मोदींना काँग्रेसची भीती? जनगणना, महिला आरक्षणावर पटोलेंचा हल्लाबोल
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करत काँग्रेसचा वारंवार उल्लेख का केला, असा सवाल उपस्थित केला. जनगणना, ओबीसी आरक्षण आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी यांच्या दबावामुळेच जनगणना मान्य केल्याचा आरोप करत, भाजपवर महिलांबाबत आणि बहुजनांबाबत दुहेरी भूमिका असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.
