पुण्यात भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे दोन महिला नेत्या एकमेकांना भिडल्या आहेत. यापैकी एक विद्यमान नगरसेविका आहेत. तर दुसरी महिला माजी नगरसेविका आहेत. दोघांमध्ये भांडणात अर्वाच्य भाषा, शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार बघायला मिळाला आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी या घटनेवर काय प्रतिक्रिया देतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल सागिरे, पुणे : पुणे महानगरपालिकेत काल घडलेल्या भाजपच्या दोन नगरसेविकांमधील वादानंतर आता आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. बाणेर परिसरातील वसतिगृह प्रकल्पाच्या कामावरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात निर्माण झालेला तणाव आता माध्यमांपर्यंत पोहोचला आहे. महानगरपालिकेत झालेल्या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहिणी चिमटे या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काम मिळवून देण्यासाठी आग्रही होत्या. हे सर्व केवळ “टक्केवारी” (कमिशन) मिळवण्यासाठी सुरू असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर आणि प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र या सर्व आरोपांना फेटाळून लावत रोहिणी चिमटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रभागात सुरू असलेल्या कामाबाबत प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला आहे, कारण ते काम त्यांच्या प्रभागातील आहे. वसतिगृह परिसरात सोसायटीची कंपाउंड वॉल डॅमेज होण्याची शक्यता असल्याने नागरिकांकडून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळेच त्यांनी अधिकाऱ्यांकडे कामाबाबत चौकशी केली, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांना विचारणा सुरू असतानाच संबंधित ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि परिस्थिती चिघळली. “मी काम सुरू केले आहे आणि मीच ते पूर्ण करणार,” असेही संबंधितांकडून सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता समोरच्या व्यक्तीची ओळख नंतर माजी नगरसेविका राजश्री काळे अशी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या वादादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ झाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे, ज्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. “प्रभागातील कोणते काम सुरू आहे आणि कोणते बंद आहे याची माहिती घेणे हे माझे कर्तव्य आहे,” असे चिमटे यांनी स्पष्ट केले.
तसेच, या संपूर्ण घटनेची माहिती पक्षाच्या वरिष्ठांना देण्यात आली असून त्यांनी यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचेही रोहिणी चिमटे आणि राजश्री काळे यांनी सांगितले आहे. मात्र या वादामुळे पुणे महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा