Pune Businessman Kidnapping Case : पुण्यातील मेट्रो कंत्राटदाराचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडी क्रशर प्लॅन्ट दाखवण्याच्या बहाण्याने ओळखीच्याच व्यक्तीने व्यावसायिकाला बोलावून कंटेनरमध्ये डांबले आणि मारहाण केली. आरोपींनी वडिलांकडे खंडणी मागताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली.
आरोपी अटक
या प्रकरणात सागर दत्तात्रय झुरुंगे (३९), विजय सुरेश वाळुंज (३८), राजू विजयकुमार सहाणे (३२), रुपेश शिवाजी गावडे (३८, सर्व रा. लोणीकंद) आणि प्रकाश बाळासाहेब राऊत (३४, रा. तुळापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
किडनॅपरसोबत आधीच होती ओळख
या प्रकरणी गहुंजे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली आहे. हे व्यावसायिक मेट्रो प्रकल्पात सिव्हिल वर्क करतात. आरोपी झुरुंगे याच्याशी त्यांची ओळख आधीपासून होती. झुरुंगे हा खडी-क्रशर माल पुरवठा करत होता आणि त्याच्याकडे सुमारे ५० लाख रुपये देणे बाकी होते.
Chhatrapati Sambhajinagar Crime : मृत्यूशी झुंज देत हायकोर्टाचा वकील 150 मीटर धावला, पण मारेकऱ्यांनी डाव साधलाच; क्लायंटला भेटायला गेले अन् घात झाला!
त्यादिवशी नेमके काय घडले?
१३ एप्रिलला झुरुंगेने फोन करून व्यवसायिकाला “कामाबद्दल बोलायचं आहे” असं सांगितलं. त्यानुसार १४ एप्रिलला खराडीतील इराणी कॅफेत दोघे भेटले. काही वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर “क्रशर प्लॅन्ट बघायला जाऊया” असं सांगत आरोपींनी त्यांना गाडीत बसवलं. मात्र, हा प्रवास थेट सापळ्यात नेणारा ठरला.
असा होता प्लॅन
खराडी जकात नाका परिसरात गाडी नेण्यात आली. त्याठिकाणी एका कंटेनरमध्ये त्यांना नेण्यात आलं. तिथे आधीपासूनच काही जण थांबलेले होते. अचानक वातावरण बदललं आणि “आजच माझे ५० लाख दे, नाहीतर सोडणार नाही,” अशी धमकी देण्यात आली. त्यांचे मोबाईल बंद करून त्यांना मारहाण करण्यात आली.
Crime News: 23 वर्षीय विवाहित तरुणीवर सासऱ्याकडून अत्याचार; वडिलांच्या कृत्याबद्दल पतीला सांगताच त्याच्याकडून अजब उत्तर!
‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात’
यानंतर आरोपींनी त्यांना पुन्हा गाडीत बसवलं. त्यानंतर पुणे-अहिल्यानगर मार्गे रांजणगावच्या दिशेने नेलं. मध्येच एका ठिकाणी गाडी बदलून दुसऱ्या वाहनात बसवण्यात आलं, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल होईल. दरम्यान, आरोपींनी व्यावसायिकाच्या वडिलांना फोन करून स्पष्ट इशारा दिला “५० लाख दिल्याशिवाय मुलगा सोडणार नाही.” वडिलांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई
खराडी पोलिसांनी लगेच कारवाई करत संशयित गाडीचा माग काढला. अहिल्यानगर रोडवरील विजय स्तंभाजवळ नाकाबंदी करून गाडी अडवण्यात आली. गाडीतून अपहरण झालेला व्यावसायिक सुरक्षित सापडला आणि पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, वेळेत कारवाई केल्यामुळे मोठी घटना टळली आहे.
