Ratnagiri Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रत्नागिरीमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे.
‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील प्रथमेश तानाजी दळवी हे काल रोजी सायंकाळी रत्नागिरीतील वेतोशी येथून आपल्या बोलेरो गाडीत म्हैस घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास आंबा घाटातील दख्खन येथे पांडुरंग लिहिलेली थार गाडी आणि भारत सरकारचा लोगो लावलेल्या इनोव्हा गाडीतून आलेल्या आठ जणांनी दळवी यांची गाडी अडवली. आरोपींनी त्यांना गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने इनोव्हा गाडीत कोंबले. तेथून त्यांना साखरपा येथील गंद्रे पेट्रोल पंपावर नेण्यात आले. तिथे आरोपींनी ५० हजार रुपयांची मागणी केली आणि दळवी यांच्या गाडीतील केबिनमध्ये ठेवलेले २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ‘जर पोलिसांत तक्रार केली तर याद राख,’ अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले होते.
Ashok Kharat: खरातने नातेवाईकांनाही सोडलं नाही! वयाच्या 20 व्या वर्षीच नात्यातील महिलेवर अत्याचार, काळ्या कारनाम्याचा भांडाफोड
दारू पिताना बसलेले दिसले
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम व त्यांच्यासोबत अवघ्या तीन पोलिसांच्या टीमने घाट परिसर पिंजून काढला. त्याचवेळेला एका आड वाटेला असलेल्या पांडुरंग कृपा वर्णनाची गाडी दिसली व त्याचठिकाणी हे सगळे संशयित आरोपी दारू पिताना बसलेले दिसले. अवघ्या तीन जणांच्या पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता कौशल्य पणाला लावत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेतील दोन जण पळून जाण्यास यशस्वी ठरले असून त्यांचा शोध सुरू आहे. पकडलेल्या पाच जणांना देवरुख न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाच जणांना तत्काळ अटक
या घटनेनंतर प्रथमेश दळवी यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचं गांभीर्य ओळखून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि लांजा पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी तत्काळ तपास पथके रवाना केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे फरहान रशिद मुल्ला (४२, रा. कोकण नगर), प्रथमेश सचिन भाटकर (२४, रा. गोळप), सर्वेश सुभाष किर (२२, रा. सोमेश्वर), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (२६, रा. कुवारबांव) आणि भूषण बिपेंद्र सावंत (२६, रा. मिऱ्या) या पाच जणांना रत्नागिरी परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.
Jalna Crime : आई गेल्यानं वडिलांचा दुसऱ्या लग्नाचा निर्णय, पोटच्या मुलाचा संताप; लग्नाच्याच दिवशी लेकरानं बापाला संपवलं
पोलीस दलाचं कौतुक
या आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, शांताराम पंदेरे, प्रशांत मसुरकर, सचिन कामेरकर, नितीन जाधव, प्रशांत साळुंखे, अमर सुतार आणि रेश्मा चव्हाण यांनी सहभाग घेतला. गुन्ह्यातील उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून या यशस्वी कामगिरीबद्दल रत्नागिरी पोलीस दलाचे कौतुक होत आहे.
