सोलापूरमधील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादाप्रकरणी मराठा नेते मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणामुळे वातावरण चिघळू नये यासाठी मनोज जरांगे यांनी मराठा आणि धनगर समाजाला शांततेचं आवाहन केलंय. तसंच या संपूर्ण घटनेमागे कुणाचा डाव आहे का, असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे.