• Sun. Jun 14th, 2026
    Palghar Accident : भरधाव वाहनाची बाईकला धडक, तिघांचा जागीच मृत्यू; त्रिकोणी कुटुंबाचा क्षणार्धात करुण अंत

    Palghar Accident News : ढेकाळे येथील वाघोबा परिसरात एक भीषण अपघात झाला आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. क्षणार्धात त्रिकोणी कुटुंबाचा अंत झाला आहे.

    पालघर अपघात तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात एका भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. भरत शंकर माघी, वंदना भरत माघी आणि सुर्या भरत माघी अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे असून हे सर्व विक्रमगड येथील राहणार आहेत.

    नेमका कसा झाला अपघात?

    अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सध्या सुरू असून मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मनोर ग्रामीण रुग्णालयात हलवले आहेत. दरम्यान, अपघात करून फरार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून पुढील तपास सुरू आहे. अतिशय भयंकर हा अपघात घडला असून शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे.
    Maharashtra TimesMumbai Crime: मुंबईमध्ये हत्या प्रकरणांची मालिका; वडाळ्यात पत्नीला संपवलं, अँटॉप हिलमध्ये २४ वर्षीय तरुणाची बॉडी सापडली

    मुंबई–गोवा महामार्गावर भीषण अपघात

    दरम्यान, काल पेण तालुक्यातील आंबिवली गाव हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. अतिवेग, निष्काळजीपणा आणि नियंत्रण सुटलेले वाहन यांचा संगम झाल्याने एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. गुढीपाडव्याच्या दिवशीच काळाने झडप घालत या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    Maharashtra TimesNeeraj Jadhav : अशोक खरात प्रकरण; सगळं कांड ज्याच्यामुळे उघड, त्या ‘मास्टरमाइंड’ नीरज जाधवचा फोटो समोरदि. १८ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजण्याच्या सुमारास आंबिवली गावाच्या हद्दीत नवीन साई सहारा हॉटेलसमोर हा अपघात घडला. अक्षत बाबूलाल राठोर (वय ३५, रा. जेएनपीटी टाउनशिप, उरण) हा त्याच्या ताब्यातील एक्सएल ६ कारने पेणहून पनवेलकडे जात असताना अतिवेगात वळण घेत होता. वेगावर नियंत्रण सुटल्याने त्याने निष्काळजीपणे वाहन चालवत उजव्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार शुभम देविदास पाटील (वय २७, रा. आंबिवली, ता. पेण) गंभीर जखमी झाला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा