अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. या कर्जमाफीवर विरोधकांनी टीका केली असून याबाबत शेतकऱ्यांनीही नाराजी बोलून दाखवली.सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही असं शेतकरी म्हणाले.यापूर्वी देखील सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती त्याचा लाभ मिळाला नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही घोषणा म्हणजे हे लबाडाचा आमंत्रण असल्याचंही शेतकरी म्हणाले.