• Sat. Mar 7th, 2026

    Anjaneri-Brahmagiri Ropeway: अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला चालना, भाविक अनुभवणार निसर्गरम्य सौंदर्य; कसा असेल 375 कोटींचा प्रकल्प?

    Anjaneri-Brahmagiri Ropeway: अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला चालना, भाविक अनुभवणार निसर्गरम्य सौंदर्य; कसा असेल 375 कोटींचा प्रकल्प?

    Anjaneri Hills Ropeway: नाशिकमध्ये अंजनेरी ते ब्रह्ममगिरी दरम्यान रोपवे उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. यामुळे भाविकांसह पर्यटकांनाही मोठा फायदा होणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, नाशिक: बहुप्रतीक्षीत अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेची सुविधा सिंहस्थात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडी येथे थेट खरेदीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यासाठीचे गटही निश्चित करण्यात आले आहेत.

    देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, संत निवृत्तिनाथांची समाधी आणि साधूंचे १३ आखाडे असे वैविध्य असलेला त्र्यंबकेश्वरचा परिसर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये आल्हाददायक वातावरणाची अनुभूती देणाऱ्या त्र्यंबकेश्वरनगरीत भाविकांचा, पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम होतो. हा पर्वत भगवान शिवाचे रूप मानला जातो. तर, रामभक्त हनुमानाचा जन्म आणि अंजनी मातेने तपश्चर्या केली ते ठिकाण अंजनेरी म्हणून ओळखले जाते.

    Maharashtra TimesMumbai-Ahmedabad Bullet Train: राज्यात बुलेट ट्रेनची 4 स्थानकं, पहिल्या टप्प्यात ठाणे, विरारचा विकास; कधी-कसं होणार काम?

    कुठून-कसा जोडणार?

    ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वताला जोडणाऱ्या ५.८ किमी अंतरावर ‘रोपवे’ प्रकल्प प्रस्तावित आहे. या रोपवे प्रकल्पात त्र्यंबकेश्वरजवळील पेगलवाडीलगत मुख्य केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी येथील २.०४२४ हेक्टर अर्थात ५.०५ एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार असून इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली आहे. संबंधित गट आणि संपादित करावयाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, जमिनींच्या मालकी हक्कांबाबत हरकत असल्यास ती १५ दिवसांत नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोणतीही हरकत न आल्यास संबंधित शेतकऱ्यांकडून थेट वाटाघाटींद्वारे हे क्षेत्र संपादित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

    Maharashtra TimesDombivli-Thane Bus: लोकलची गर्दी कमी करण्यासाठी डोंबिवली-ठाणे बस, 4 मार्चपासून सेवा सुरू; पण डोंबिवलीकरांना खरंच होईल का फायदा?

    काही वर्षांपूर्वीच घोषणा

    सन २०२२-२३ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. राज्यात नाशिकच्या ब्रह्मगिरीसह पुण्यातील राजगड व रायगड जिल्ह्यातील माथेरान आणि महाडमध्ये रोपवे होत आहेत. त्यापैकी ब्रह्मगिरी-अंजनेरीला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. केंद्राच्या ‘पर्वतमाला’ योजनेंतर्गत होणाऱ्या या चारही प्रकल्पांचा एकूण खर्च एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असणार आहे. ब्रह्मगिरी प्रकल्पासाठी सुमारे पावणेचारशे कोटी रुपयांहून अधिकचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सरकार आणि खासगी कंपनी मिळून (हायब्रीड ॲन्युइटी मोड) राबविणार आहे. सिंहस्थाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा