• Fri. Mar 20th, 2026
    सोलापुरात माजी आमदारांचा ‘पॉवर गेम’; लेकाची 6 हजारांच्या मताधिक्याने बाजी; काँग्रेसला मोठा धक्का!

    माजी आमदार दिलीप मानेंच्या लेकानं बाजी मारली;सहा हजारच्या लीडनं जिप सदस्य, काँग्रेसच्या मातब्बर नेत्याला केलं पराभूत

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच निकाल लागलं असून उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज मानें यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.पृथ्वीराज मानें हे भारतीय जनता पार्टीकडून कोंडी जिप गटातून निवडणुक लढवली काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भारत जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत पृथ्वीराज मानेंचा विजय झाला आहे.माजी आमदार दिलीप मानें यांच्या मुलाच्या विजयाने दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यात मानेंचा वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.विजय होताच पृथ्वीराज मानें व त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.

    माने कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय
    दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या दोन तालुक्यात मानें कुटुंबीयांची मोठी राजकीय ताकद आहे.मागील एक दशकापासून माने कुटुंबीयाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी दिलीप मानेंचा महाविकास आघाडीने पत्ता कट केला होता.काही दिवसांपूर्वी दिलीप मानें यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला होता.सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत दिलीप माने यांनी शांत भूमिका घेतली होती.,जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र मुलगा पृथ्वीराजला मैदानात उतरविले होते.दिलीप माने हे देखील आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व केले आहे.दिलीप मानें यांचे वडील ब्रह्मदेव दादा मानें हे देखील आमदार होते.माने कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

    काँग्रेसच्या तालुका अध्यक्षकांला पराभूत केले आहे
    पृथ्वीराज दिलीप माने यांच्या समोर कोंडी जिल्हा परिषद गटात काँग्रेस तालुका अध्यक्ष भारत जाधव यांच तगड आवाहन होतं.पृथ्वीराज माने यांच्या प्रचारासाठी स्वतः दिलीप मानें निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.अनेक ठिकाणी सभा ,मतदारांच्या गाठीभेटी घेत दिलीप माने यांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती.अखेर निकाल लागला असून 6 हजार मतांच्या लीडने पृथ्वीराज दिलीप माने यांचा विजय झाला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा