• Fri. Mar 6th, 2026
    राज ठाकरेंचा मराठवाड्यात करिष्मा, लातूर जिल्हा परिषदेत मनसेचा विजयाचा गुलाल

    Raj Thackeray : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील मिनी मंत्रालयाचा कारभार कुणाच्या हाती जाणार ? पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला होत आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    लातूर : लातूर जिल्हा परिषदेचे निकाल लागण्यास सुरुवात झाली असून राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले खाते उघडले आहे. रेणापूर तालुक्यातील पानगाव जिल्हा परिषद गटामध्ये मनसेचे उमेदवार डॉ सुनील नागरगोजे विजयी झाले आहेत, तर पंचायत समिती कोस्ट गाव येथे मनसेच्या श्रीदेवी गालफाडे, पानगाव येथे मोनिका रवी सूर्यवंशी या विजयी झाल्या आहेत.

    मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांतील मिनी मंत्रालयाचा कारभार कुणाच्या हाती जाणार ? पंचायत समित्यांवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला आज होत आहे. नगरपालिका, महापालिकांपाठोपाठ या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुकांची निवडणुकीत चांगलीच गर्दी होती. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभा, डिजिटल माध्यमांचा प्रचारासाठी वापर, आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली. जवळपास तीन वर्षांपासूनचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासक राज सोमवारी संपत आहे. त्यातच आता लातूर जिल्हा परिषदेच्या मनसेने आपले खाते उघडले आहे.
    Maharashtra TimesBengaluru Crime : तीन वर्षांचं रिलेशनशीप मोडलं, गर्लफ्रेण्डने लग्नाची पत्रिका-साडी दाखवली, बॉडीबिल्डर बॉयफ्रेण्डने मृत्यूला कवटाळलं
    जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ झालेल्या मतदानात लातूर जिल्ह्यातील ९ लाख ५१ हजार २३५ मतदारांनी म्हणजेच ६३.७९ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी २४२ उमेदवार, तर दहा पंचायत समित्यांच्या ११८ जागांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आज प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणी सुरु असून यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयारीत आहे.
    Maharashtra TimesYavatmal Crime : फोन केला की बस स्थानकात भेट, मुख्याध्यापकाची धमकी, सातवीतील मुलीवर कारमध्ये अत्याचार; रात्री 11 वाजता कॉल आला अन्…
    लातूर जिल्ह्यात मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी १४२ टेबल लावण्यात आले आहेत. लातूर येथे २०, अहमदपूरमध्ये १४, उदगीर येथे १४, निलंगा येथे २०, औसा येथे १८, रेणापूर येथे १६, देवणी येथे १२, शिरूर अनंतपाळ येथे ८, चाकूर येथे १० आणि जळकोट येथे १० टेबलवर ईव्हीएम मतमोजणी होईल. यासोबतच टपाली मतपत्रिका मोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतमोजणीसाठी जिल्ह्यात १ हजार २९१ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा