Ajit Pawar: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी ऊर्जामंत्रिपद सांभाळले.
वीज कायद्यानुसार सन २००५मध्ये महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे (एमएसईबी) मुख्य कंपनीसह ‘महानिर्मिती’, ‘महापारेषण’ आणि ‘महावितरण’ या चार कंपन्यांमध्ये विभाजन करण्यात आले. या सर्व कंपन्यांना आर्थिक शिस्त लावण्याचे काम अजित पवारांनी केले.
Ajit Pawar : अपघात नेमका कसा घडला? नेमकं काय घडलं? प्रफुल्ल पटेल यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला
वीज कंपन्यांमध्ये हजारो विद्युत सहायक पदांची भरती प्रक्रिया राबविली. थकबाकी असलेल्या परिसरामध्ये वीजबिल भरल्यास तीन दिवसांत नवीन रोहित्र बसवू, अशी ग्वाही त्यांनी दिल्यावर शेतकऱ्यांनी कृषीपंपाची थकीत बिले भरली होती. त्यामुळे कृषीपंपांची थकबाकी मोठ्या प्रमाणात कमी झाली होती. राजकीय नेतेमंडळींकडून उपकेंद्र, रोहित्र बसविण्याची मागणी आल्यानंतर तेथे वीजबिलांची वसुली तपासूनच मंजुरी देऊ, असे अजित पवार परखडपणे सुनावत असत, अशा आठवणी ‘महावितरण’च्या माजी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितल्या.
माझे खाते मला चालवू द्या
जालना येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तो सुरू करण्यास सांगितला. त्यामुळे ऊर्जामंत्री अजित पवारांनी त्यांना फोन लावून ‘हे माझे खाते असून, ते मला चालवू द्या,’ असे सुनावले होते. इतकेच नव्हे, तर तेथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला वीजबिलांची थकबाकी भरायला लावली होती, अशी आठवणही ‘महावितरण’च्या माजी अधिकाऱ्याने सांगितली.
अजितदादांची अकाली एक्झिट, महाराष्ट्र शोकाकुल; ‘त्या’ चार्टर्ड प्लेनबद्दल धडकी भरवणारी माहिती समोर
मुख्यमंत्र्यांच्याच बंगल्याची वीज बंद
अजित पवार यांच्या आदेशांनुसार थकलेल्या वीजबिलांच्या वसुलीची धडक मोहीम ‘महावितरण’कडून हाती घेण्यात आली होती. त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सरकारी बंगल्याचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने गदारोळ माजला होता. सरकारी बंगल्यांचे वीजबिल हे संबंधित खात्यांकडून भरण्यात येते, त्यामध्ये काही त्रुटी राहिल्याने हा प्रसंग उद्भवला होता. मात्र, कारवाईच्या सपाट्यात तेथील वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. दरम्यान, नगर जिल्ह्यातील मुळा- प्रवरा वीज संस्था प्रचंड तोट्यात सुरू होती, पवार हे ऊर्जामंत्री असताना त्यांनी ती बंद करण्याचा अप्रिय निर्णय धाडसाने घेतला होता, अशीही आठवण सांगितली जाते.
Ajit Pawar : बोलणं झालं अन् 30 मिनिटांनी दु:खद बातमी, भाजप नेता असलेल्या जवळच्या नातेवाईकाला दादांचा शेवटचा कॉल
अजित पवार ऊर्जामंत्री असताना पुण्यातील ‘प्रकाशभवना’ची उभारणी झाली. पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांनी नवीन उपकेंद्र, वाड्या-वस्त्यांमध्ये वीजयंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिला. विजेच्या पायाभूत सुविधा निर्मितीवर त्यांनी सदैव भर दिला; तसेच वीजबिलांच्या वसुलीबाबतही सातत्याने आग्रह धरला. ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांची त्यांनी वेळोवेळी पाठराखण करून प्रोत्साहन दिले. –राजेंद्र पवार, संचालक, महावितरण
