Mumbai Mayor : मुंबई महापालिका निवडणूक होऊन १० दिवस उलटल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेकडून गटनोंदणी करण्यात आलेली नसल्याने यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले
मुंबई महापालिका निवडणूक होऊन १० दिवस उलटल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेकडून गटनोंदणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ‘महापालिकांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता गटनोंदणी सुरू आहे. गट स्थापन करताना त्याच्या पर्सेंटाइलचा विचार करावा लागतो. कधी एकत्र नोंदणी करून फायदा असतो, तर कधी वेगळी करून फायदा होतो.
महापौर-उपमहापौर ही पदे वगळून इतर पदे तुमच्या एकूण संख्याबळाच्या पर्सेंटाइलवर ठरतात. स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य येण्यासाठी काय व्यूहरचना आखता येईल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असे सांगितले. ‘दोन्ही गटांची एकत्र नोंदणी किंवा वेगळी नोंदणी किंवा एक छोटा गट त्यांच्यासोबत नोंदणी करायची, या सर्व शक्यतांचा विचार करत आहोत. आम्ही एकत्रित बसूनच निर्णय घेऊ. बहुतांश महापालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय आम्ही एकत्र बसूनच घेऊ’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेकडून कोकण भवन येथे स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मात्र, नंतर तो अचानक मागे घेण्यात आला. त्यानंतर भाजप-शिवसेनेची एकत्रित गटनोंदणी करण्यावर चर्चा करण्यात आली. एकत्रित गटनोंदणीमुळे मुंबई महापालिकेतील स्थायी समिती, सुधार समितीसह अन्य समित्यांतील सदस्य संख्यांची जुळवाजुळव करणे शक्य होणार आहे. यातून समितींच्या चाव्या आपोआप महायुतीकडे येणार आहेत.
Anjali Bharti : अमृता फडणवीसांबद्दल प्रख्यात गायिकेची गलिच्छ टीका, ठाकरेंच्या रणरागिणीही भडकल्या, किशोरी पेडणेकरांनी…
सुधार समितीवर एकूण २६ सदस्य संख्या असून भाजप-शिवसेनेची स्वतंत्र गटनोंदणी झाली असती तर महापालिकेतील कोटा व सूत्रानुसार अनुक्रमे १० आणि तीन अशी एकूण १३ सदस्यत्व मिळाले असते. तर, शिवसेनेला (उबाठा) आठ व मित्रपक्ष काँग्रेसला तीन, मनसेला एक आणि ‘एमआयएम’ला एक सदस्यत्व मिळाले असते. त्यामुळे सुधार समितीत महायुतीचे १३ आणि उबाठा व मित्रपक्षांचे १३ सदस्य झाल्याने सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली असती. यात महायुतीविरोधात एक मत पडले असते तरी समितीचे अध्यक्षपद जाण्याचा धोका महायुतीला होता. त्यामुळेच भाजप-शिवसेनेने एकत्रित नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून महायुतीचे १४ सदस्य होत असून, शिवसेनेचे (उबाठा) सदस्यत्व आठवरून सातवर येत आहे. तर, अन्य मित्र पक्षांचे सदस्यत्व ‘जैसे थे’च राहणार आहे.
BMC Election : प्रश्न तेच, पुनर्वसनाचा पेच! कोणाचं तिकीट अडलं, कोणी निवडणुकीत पडलं; या दिग्गजांसमोर आता कुठला मार्ग?
एकत्रित गटनोंदणीमुळे बेस्ट समिती अध्यक्षही महायुतीला मिळणार आहे. शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक होते. यामध्ये महायुतीचेच वर्चस्व असल्याने त्यांच्याकडेच पद जाणार हे निश्चित आहे.
BMC News : एकनाथ शिंदेंच्या २९ नगरसेवकांची स्वतंत्र गटस्थापना ? भाजपची BMC मध्ये डोकेदुखी वाढणार
