Eknath Shinde News : कोल्हापूर महापालिका निवडणुक काँग्रेसने गाजवली. जरी सत्ता नाही आली तरी काँग्रेसने ३५ जागांवर गुलाल उधळला. निकालानंतर शिंदेंनी काँग्रेसचा शिलेदार फोडला आहे. कोण आहे जाणून घ्या.
आबाजींच्या नेतृत्वाने काँग्रेसला दिला धक्का
गेल्या तीन ते साडेतीन दशकांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आणि विशेषतः गोकुळ दूध संघाच्या सत्ताकेंद्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे आबाजी यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे पारडे जड करणारा ठरला आहे. आबाजींची राजकीय ताकद, अनुभव आणि गोकुळसारख्या महत्त्वाच्या संस्थेतील प्रभाव यामुळे शिवसेना अधिक भक्कम होईल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. येत्या काळात कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील राजकारणावर याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश शिवसेनेसाठी मोठा ट्विस्ट ठरणार आहे. या सोहळ्यात आबाजी यांच्यासह त्यांचे सुपुत्र सचिन पाटील तसेच बुद्धीराज पाटील (महे), नंदू पाटील, वीरशैव बँकेचे माजी अध्यक्ष अनिल सोलापुरे, रयत संघाचे संचालक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर अशा एकूण 38 काँगेसच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. सर्वांनी एकत्रितपणे शिवसेनेचे झेंडे हातात घेऊन पक्षप्रवेशाची शपथ घेतली.
Kolhapur Accident: कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी, PI ची तडकाफडकी बदली
उपमुख्यमंत्री शिंदे आणि आ. नरके यांच्याकडून स्वागत..
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी सर्व नवप्रवेशितांचे शिवसेना पक्षात सहर्ष स्वागत केले. त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देताना शिंदे म्हणाले, “शिवसेना ही जनतेची खरी साथी आहे. नवप्रवेशितांच्या सहभागाने पक्ष अधिक मजबूत होईल.” आमदार नरके यांनी बोलताना सांगितले की, “पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील जनतेच्या हितासाठी हे सर्वजण समर्पित भावनेने कार्य करतील, असा माझा दृढ विश्वास आहे. गोकुळच्या राजकारणातही हे बदल सकारात्मक ठरतील.”
Municipal Election Result : एकटा भिडला, महायुतीला नडला, महापालिकेत सत्ता भाजप-सेना- NCP ची, पण राज्यात चर्चा काँग्रेसच्या नेत्याची
या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांमध्ये गोकुळ संचालक अजित नरके, एस. आर. पाटील, राहुल खाडे, उत्तम वरुटे, किशोर पाटील, अमित वरुटे, शैलेश वरुटे, एकनाथ पाटील आणि सर्जराव हुजरे यांचा समावेश होता. हा पक्षप्रवेश कोल्हापूरातील काँग्रेसला मोठा धक्का देणारा असून, स्थानिक राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. तर या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड वाढेल आणि गोकुळसारख्या संस्थांवरही प्रभाव पडणार असे चित्र दिसत आहे.
