फडणवीस म्हणाले, “आज आपल्या सर्वांकरीता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. जेव्हापासून मुंबईचं कार्यालय झालं, तेव्हापासून हे कार्यालय वाट पाहत होतं ते म्हणजे मुंबईत सर्वाधिक जागांवर भाजपचा विजय. त्यासाठी आपल्या सर्वांचं अभिनंदन. भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत भाजप क्रमांक 1 चा पक्ष ठरला आहे. मुंबईकरांनी विकासाच्या अजेंड्याला समर्थन दिलं आहे.
मुंबईतील सर्वात मोठा पक्ष आपणचं आहोत. मुंबईत आपल्याला 45 टक्के मतं मिळाली आहेत. मुंबईकरांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे.”
Ahilyanagar Crime : धक्कादायक! प्रायव्हेट फोटो अन् 20 लाखांची मागणी; खंडणीखोर टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, नेमकं काय घडलं?
“आपल्या सहकार्यांना म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेला देखील 29 जागा मिळाल्या. त्यांच्याही काही जागा थोड्या मतांनी पराभूत झाल्या. पण भाजप आणि शिवसेनेला पूर्ण बहुमत प्राप्त झालं आहे. गेल्या 3 निवडणुकीत 89 जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या नव्हत्या. ज्या आता भाजपला मिळाल्या आहेत”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “आपला विजय कमी दाखवण्याचा काही लोक प्रयत्न करतात. पण, कोणत्याही प्रभागामध्ये तुम्ही बघा सगळीकडे भाजपला मतं मिळाली आहे. भाषेच्या पलिकडे जात, समाजाच्या, जातीच्या पलिकडे लोकांनी भाजपला मते दिली आहे. आणि विशेषत: मुंबईतील मराठी माणसाला आपली जहागिर समजत होते त्या मराठी जनतेनंही आपल्याला मतदान केलं. मुंबईतल्या झोपडपट्टीतही, इमारतींमध्येही, चाळीतही, कोळीवाड्यातही आम्ही निवडून आलो.
सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी अशा प्रकारचं यश हे भाजपने मिळवलेलं आहे, यासाठी मी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष्य अमित साटम यांचं अभिनंदन करतो. तसेच सर्व टीम मुंबईचा हा विजय आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.
