• Sun. Jun 7th, 2026
    Ahilyanagar Crime : धक्कादायक! प्रायव्हेट फोटो अन् 20 लाखांची मागणी; खंडणीखोर टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश, नेमकं काय घडलं?

    खळबळजनक! प्रायव्हेट फोटो व्हायरल करु म्हणत 20 लाख मागितले; आधी दीड लाख घेतले, पुढे… श्रीगोंद्यात धक्कादायक प्रकार, काय घडलं?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: सोशल मीडियाच्या आड लपून प्रायव्हेट फोटो व्हायरल करण्याची धमकी, जीवावर उठणारे मेसेज आणि तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या श्रीगोंदा पोलिसांनी खंडणीखोर टोळीचा कणा मोडून काढला आहे. तीन सराईत आरोपींना गजाआड करत पोलिसांनी ५४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.

    १ जानेवारीपासून फिर्यादी वैभव आसाराम खेंडके (वय २७, रा. श्रीगोंदा) यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअ‍ॅपवर धमकीचे मेसेज येऊ लागले. तुझे खासगी फोटो व्हायरल करू अशी भीती दाखवत आरोपींनी २० लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या वैभव यांनी सुरुवातीला १ लाख ५० हजार रुपये दिले. मात्र एवढ्यावर न थांबता आरोपींनी आता तुला किंवा तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही” अशी जिव्हारी लागणारी धमकी दिली.

    प्रकरणाचे गांभीर्य ओळखून श्रीगोंदा पोलिसांनी वेळ न दवडता मोहीम उघडली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. सायबर सेलच्या मदतीने मोबाईल ट्रेसिंग करत खंडणीखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चौकशीत आकाश पोपट मोरे, बापू विठ्ठल शिंदे आणि किरण विठ्ठल शिंदे हे तिघे मुख्य आरोपी निष्पन्न झाले.

    Maharashtra TimesDharashiv Crime: धक्कादायक! ‘कुटुंब नियोजन का केलं नाही?’ शुल्लक वादातून दगडाने ठेचून संपवलं; तुळजापूर हादरलं

    ३ मोबाईल फोन आणि ३ चारचाकी वाहने एकूण किंमत ५४.८० लाख रुपये मुद्देमाल जप्त

    दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेले ३ मोबाईल फोन आणि ३ आलिशान चारचाकी वाहने जप्त केली आहेत याशिवाय एकूण मुद्देमालाची किंमत ५४.८० लाख रुपये इतकी आहे. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता असून टोळीचा पसारा मोठा असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

    ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. श्रीगोंदा पोलीस आणि सायबर सेलच्या पथकाने दाखवलेली तत्परता सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा