महापालिका निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या पाच दिवसांत मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना ओपन चॅलेंज दिलं.
“मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली कामे अद्याप सुरू केली नाही, पाणी मिळत नाही. इथे माणसे राहतात का नाही? जर माणसे राहत असतील तर त्यांच्यात चीड आहे की नाही? मी मुख्यमंत्री राहिलो असतो तर अद्याप पाणी मिळालं असतं. महानगर पालिकेकडे पैसे नसल्याने मी त्यांचा खर्च सरकारकडे लावला होता. दोनदा येऊन पाहणी करून गेलो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“पैशांची मस्ती निवडणूक फिरवणार असेल तर आपलं आयुष्य कसे असणार आहे ते कळेल, अस्तित्वाची लढाई तुमची असणार आहे. जाहिराती लावल्या, लाज वाटली पाहिजे, ट्रिपल इंजिन सरकार म्हणे… भाजपा म्हणते नशा मुक्त करू. सरकार तुमचे असताना नशा मुक्ती झाली नाही. महानगरपालिका देऊन कसे होईल? दारू मिळते, पाणी नाही. खोटे लोक आहेत. आम्ही भरवलं नसतं तर राजकारणात तुमचा मृत्यू झाला असता. शहराचे नाव मी बदलले. तुम्ही छत्रपती लावले हे चांगलं केलं. मात्र आम्ही केलं म्हणून झाले. नाहीतर तुमच्यात हिंमत नसती. अहमदाबादचे कर्णावती करून दाखवा, अमित शाह यांचा मतदारसंघ आहे”, असं ओपन चॅलेंज उद्धव ठाकरे यांनी दिलं.
BMC All Candidate List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या प्रभागात कोणाकोणात लढत? वाचा A टू Z यादी
“भाजप जगातला मोठा पक्ष, पण उमेदवार नाहीत. याला उचल, त्याला उचल असं सुरू आहे. बदलापूर अत्याचार घटनेत आरोपीचा एन्काउंटर केला. त्याचा सहआरोपी तुषार आपटे संघाचा माणूस असल्याचा आरोप आहे. नंतर त्याचे काय झाले? आता तो स्वीकृत नगरसेवक कसा? तुमचे नगरसेवक निवडून आणण्यास मदत केली म्हणून विकृत माणसाला स्वीकृत नगरसेवक केला का? भाजप होता राष्ट्रपथम, तो गेला, आता भ्रष्टाचार प्रथम असा झाला आहे का? निष्ठावंतांचे हाल सुरू आहेत, बाहेरून आलेल्या घाण लोकांना अंघोळ घालण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Panvel Election All Candidate List : पनवेल महापालिका निवडणुकीतील संपूर्ण उमेदवारांची A टू Z यादी, वाचा सविस्तर
“जयंत पाटील यांनी काल भाषणात मांडलेले मुद्दे चुकीचे नाही. तुम्ही म्हणत होते ना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. आता कुठे ठेवला सांगा. तुमचे वेगळेपण तुम्ही गमावले आहेत. जाऊ तिथे खाऊ झाले, मुजरा बंद करायला गेले आणि स्वतः मुजरा करून आले. विकासावर बोला म्हणे पाण्याच्या योजना कोणी आणली, गुंठेवारी सारखा प्रश्न सोडवला, रस्ते केले हे कोणी केले? तुम्ही सांगा शेतकऱ्यांच्या वीक विम्याचे तुम्ही काय केल? फोन पे पाहा दोन-दोन हजार रुपये वाटले जात आहेत. त्याकडे पोलिसांनी पहावे. पहिल्यांदा निवडणूक पाहिली की विरोधात कोणी राहू नये म्हणून पैशांचा वापर करून बिनविरोध निवडणूक घेण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
Thane Municipal Election Candidate List : ठाणेकरांनो तुमच्या कामाची बातमी! महापालिका निवडणुकीतील A टू Z उमेदवारांची यादी इथे वाचा
“पैशांचा माज करू नका. ममता बॅनर्जी सारखे रस्त्यावर उतरु.. अजित पवार तोंड मोठं करून सांगत आहेत. हे आरोप करत होते ते सत्तेत माझ्यासोबत आहेत. माझ्या सोबत पण होते, ज्यांनी सत्तर हजार कोटींचा आरोप केला त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसतात कसे? फडणवीस यांनी गाडी भरून पुरावे नेले. आता काय करायचे त्या पुराव्यांचे? जर कागद खरे असतील तर अजित पवार यांना आरोप सिद्ध होईपर्यंत सोबत घेऊ नका आणि जर खोटे असतील तर अजित पवार यांची माफी मागा”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. “आमचा पक्ष चोरण्याचा प्रयत्न केला. पण मी आमचे घराणे पुढे घेऊन जात आहे. माझ्या वडिलांचे नाव कशा वापरता? त्यांना देखील लाज वाटत असेल. सगळंच चोरायला निघाले”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
