• Sun. Jun 7th, 2026
    Parbhani Accident : कीर्तनाहून परतताना काळाची झडप, भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा करुण अंत; वारकरी संप्रदायावर शोककळा

    Parbhani Accident Three Pilgrims Died : परभणी-जिंतूर रोडवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

    तीन वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धनाजी चव्हाण, परभणी : सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने बऱ्याच ग्रामीण भागात आणि गावोगावी कीर्तन सोहळे साजरे होत आहेत. रात्री उशिरापर्यंत गावागावात कीर्तनाचे सोहळे संपन्न होत आहेत. असाच सोहळा परभणी तालुक्यातील पिंपळा या गावामध्ये चालू होता. या कीर्तन सोहळ्यासाठी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील तिघेजण पिंपळा या गावी आले होते.

    वारकरी संप्रदायावर शोककळा

    रात्री उशिरापर्यंत कीर्तनाचा आस्वाद घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावाकडे दुचाकीवर निघाले. परभणी-जिंतूर रोडवरून जाताना परभणीच्या झरी गावाजवळ लोअर दुधना कालव्याजवळ त्यांच्या दुचाकीचा अन् कारचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात तीनही वारकऱ्यांचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या वारकऱ्यांमध्ये ह.भ.प माऊली दिगंबरराव कदम (वय 30) ह.भ.प प्रसाद राव कदम (वय 45, वर्ष दोघेही राहणार बोर्डिंग तालुका जिंतूर) आणि ह.भ.प दत्ता माणिकराव कराळे (वय 30, रा. मुळा तालुका जिंतूर) अशी मयतांची नावे आहेत. तिघंही वारकऱ्यांचा करुण अंत झाल्यानं वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
    Maharashtra TimesKolhapur Crime : ‘तुला बाळ होत नाही, तुझ्या नवऱ्याचं…’; विवाहितेचा सतत छळ, त्रासाला कंटाळून महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापूर हळहळलं

    संपूर्ण गावात हळहळ

    मिळालेल्या माहितीनुसार, माऊली कदम, दत्ता कराळे आणि प्रसाद राव कदम हे तिघेही परभणी तालुक्यातील पिंपळा येथे काल रात्री कीर्तनासाठी गेले होते. रात्री उशिरा एकच्या सुमारास किर्तन सोहळा संपल्यानंतर तिघेजण दुचाकीवर परभणी-जिंतूर या महामार्गाने आपल्या बोर्डी गावाकडे निघाले. गावाकडे जात असताना झरी गावाजवळ असलेल्या लोअर दुधना कालव्याच्या परिसरात त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्याचं कळाल्यानंतर लगेचच या तिघांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान, तिघांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिघांनाही मयत घोषित केले. अपघात एवढा भीषण होता की दुचाकी थेट दुसरीकडे जाऊन पडली होती.
    Maharashtra Timeskolhapur News : प्रेमप्रकरणातून जंगलात जात तरुण-तरुणीने संपवलं जीवन, एकाच दोरीने… कोल्हापूरमध्ये खळबळदरम्यान, तीनही वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परभणी जिल्ह्यामध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे या तिघांपैकी दोघेजण परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मूळ गावातील वारकरी होते. आई-वडिलांसह नातेवाईकांनी देखील हंबरडा फोडला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा