अंबरनाथ नगरपालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र, ही अनैसर्गिक युती अवघ्या काही तासांतच तुटली. आता शिंदे सेनेची ताकद वाढली असून, त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नसल्याने त्यांची सौदाशक्ती वाढली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या. पण पक्षाला एकहाती सत्ता मिळवता आली नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिंदेसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. त्यानंतर शिंदेसेनेला बहुमतापासून रोखण्यासाठी भाजपनं १२ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला आणि ४ जागा जिंकणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली. भाजपच्या या चालीमुळे शिंदेसेना सत्तेपासून दूर राहिली. भाजपनं केलेल्या या युतीमुळे शिंदेसेनेत नाराजी पसरली. शिंदेसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांनी संताप व्यक्त केला.
भाजप-काँग्रेसची युती, पहिली विकेट पडली; प्रदेशाध्यक्षांनी फर्मान काढलं, मोठी कारवाई
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा देत असताना अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेसशी युती केली. या युतीचं वृत्त देशभरातील माध्यमांनी दिलं. तत्त्वांची भाषा करणारे, विचारधारा सांगणारे सत्तेसाठी काय काय करतात, कशा आघाड्या, युत्या करतात, अशी चर्चा यामुळे पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस सोबतच्या युतीबद्दल तीव्र नाराजी बोलून दाखवली. तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या १२ नगरसेवकांचं निलंबन केलं. वरिष्ठ पातळीवरुन चक्रं फिरल्यानं भाजप-काँग्रेसची युती अवघे काही तासच टिकली.
अजितदादांच्या धुरंधर नेत्याविरोधात भाजपची फिल्डींग; विधानसभेला सव्वा लाख मतं घेणारा नेता परतणार
अंबरनाथ नगरपालिकेत शिंदेसेनेला एकटं पाडून भाजपनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सत्तेचा सोपान गाठला. त्यामुळे सर्वाधिक जागा जिंकूनही शिंदेसेनेला सत्तेपासून दूर राहावं लागलं. पण आता काँग्रेस-भाजपची युती तुटल्यानं शिंदेसेनेनं सुटकेचा निश्वास सोडला आहे. युती तुटल्याची सर्वाधिक मोठी लाभार्थी शिंदेंची शिवसेना ठरली आहे. आता शिंदेसेनेशिवाय सत्ता स्थापना करता येणार नाही, असं संख्याबळ आहे. त्यामुळे शिंदेसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. तर या युतीमुळे भाजप , काँग्रेस डॅमेज झाली आहे.
