• Mon. Mar 9th, 2026
    विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने देशमुखांचे सुपुत्र दुखावले, म्हणाले…

    Latur Municipal Election : आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय, की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    लातूर : महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडत आहेत. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेलं विधान टीकेचा विषय ठरत आहे. “विलासरावांच्या आठवणी या (लातूर) शहरातून नक्कीच पुसल्या जातील” असं चव्हाण म्हणाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्यासह विलासरावांचे सुपुत्र अमित देशमुख, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही रवींद्र चव्हाणांना उत्तर दिलं आहे.

    रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?

    खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येतंय, की हंड्रेड पर्सेंटेज विलासरावांच्या आठवणी या (लातूर) शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काहीच शंका नाही, असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं.
    Maharashtra TimesMaharashtra Politics : भाजपचे एका जागेसाठी ‘चुकून’ दोघींना AB फॉर्म; बंडखोर कमळावर, अधिकृत उमेदवार ‘बॅटबॉल’वर, चर्चा मात्र पक्षाच्या खेळीची

    हर्षवर्धन सकपाळ काय म्हणाले?

    “स्व. विलासराव देशमुख साहेबांच्या आठवणी लातूर जिल्ह्यातून पुसू शकणारा अजून कोणी निर्माण नाही झाला. अनेक जण इच्छा बाळगून आलेत आणि स्वाभिमानी लातूरकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलीय. विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली, त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य लातूरच्या विकासासाठी समर्पित केलं. आज त्यांच्याबद्दल हे सत्तेचा माज असलेले भाजप नेते लातूरात येऊन बरळून जातात की साहेबांच्या आठवणी पुसल्या गेल्यात. त्यांना काय समजणार विलासराव देशमुख साहेबांचं लातूरशी असलेलं नातं. लातूरच्या कर्तृत्वसंपन्न सुपुत्राचा अपमान लातूरकर कधीही सहन करणार नाही, भाजपवाल्यांनो याद राखा, करारा जवाब मिलेगा!” असा इशारा हर्षवर्धन सकपाळ यांनी दिला.
    Maharashtra TimesVikrant Patil : ‘लाडक्या बहिणी’साठी भाजप आमदाराने पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावली? हिमतीची राज्यभर चर्चा

    अमित देशमुख काय म्हणाले?

    “भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये येऊन आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या संदर्भाने जे विधान केलंय, ते अत्यंत दुर्दैवी दुःखदायक आहे, त्यांच्याकडून आणि भारतीय जनता पक्षाकडूनही अशा वक्तव्याची अपेक्षा नव्हती, त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्हा सर्व लातूरकरांची मने दुखावली आहेत. आम्ही त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत आहोत.” अशा भावना अमित देशमुख यांनी व्यक्त केल्या.

    BMC Election 2026 | मुंबई महापालिकेवर कुणाचा महापौर बसणार? दादरकरांना काय वाटतं?

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा