भाजप आणि शिवसेना महायुतीचा प्रचाराचा नारळ आज मुंबईत फुटला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट देखील केला. “छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामूला पक्षात घेतलं. तिकीट दिलं. काय चालू आहे? त्यांनी काय-काय केलंय ते आपल्याला माहिती आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर देवेंद्रजी ह्यांना उलटं टांगून फटके दिले असते. दिले असते की नाही?”, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“काही जण निवडणुका आल्या की पार इतिहासात जातात. सातवीचं पुस्तक उघडतात. सूर्याची पिसाळ, अब्दाली, अफलज खान, त्यांना सर्व आठवतं. बाळासाहेबांचे विचार जपणारा सूर्याजी पिसाळ आहे की त्यांच्या विचारांचा मारेकरी सूर्याजी पिसाळ? लोकांना माहिती आहे. म्हणून ज्यांनी विचार सोडले, भाजपच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, 50 फोन देवेंद्र फडणवीस यांनी केले याचा मी साक्षीदार आहे”, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला. Municipal Election : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना धडकी भरवणारी बातमी, मनसेचा मोठा निर्णय “ज्या देवेंद्र फडणवीस यांना मी सांगितलं, विनंती केली, त्यामुळे मागचा महापौर कसा झाला तो माहिती आहे. आतल्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती नसतील. पण त्या माणसाचा तुम्ही फोन घेऊ शकत नाहीत. तुम्ही ठरवलं होतं की, काय करायचं. सत्तेसाठी लाचार झाले म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची माळ तोडली. जनतेला माहिती आहे कोण खरा सूर्याजी पिसाळ. कारण जनतेने पाहिलं आहे की, खुर्चीसाठी काय-काय केलंय”, अशी टीका त्यांनी केली. Ajit Pawar : गुन्हेगाराच्या पत्नीला उमेदवारी का दिली? अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं, म्हणाले…
‘तुमच्यासारखे लाचार होणार नाही’, शिंदेंची टीका
“आम्ही कायम बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही जे धाडस केलं ते आपल्याला माहिती आहे. आम्ही कुणाची सत्ता घेऊन गेलो नाही. सत्तेवरुन पायउतार होऊ गेलो. आमच्या मंत्रिपदावर पाणी सोडून गेलोय. फक्त आणि फक्त आणि बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणून आणि शिवसेनेचे खच्चीकरण केलं म्हणून आम्ही हे केलं. आम्ही जीव गेला तरी तुमच्यासारखे लाचार होणार नाही”, असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा