• Sun. Jun 21st, 2026
    Akola Crime : दोन्ही प्रेमात आकंठ बुडाले, लग्नाच्या आणाभाका, पण कुटुंबाचा विरोध; अखेर प्रेमी युगुलानं…; महाराष्ट्र सुन्न

    Akola Couple Commits Suicide : अकोल्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरच्यांचा लग्नाला विरोध असल्यामुळे एका प्रेमी युगुलाने आपलं जीवन संपवल्याचं समोर आलं आहे.

    बाळापूर शेळद प्रेमी युगुलाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील शेळद येथील एका प्रेमी युगुलानं रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर 2025ला घडली. त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांनी विरोध केल्यानं या प्रेमी युगुलानं असं टोकाचं पाऊल उचलत रेल्वे खाली उडी घेत आत्महत्या केली. अक्षय सुरेश थारकर (वय ३२) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर अक्षदा मोहन शेजोळे (वय 24) असं तरुणीचं नाव आहे.

    नेमकं काय घडलं?

    अक्षय सुरेश थारकर आणि अक्षदा मोहन शेजोळे या दोघांचे अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील कसुरा गावाजवळील रेल्वे ट्रॅकवर दोघांचे मृतदेह आढळून आले. याची माहिती मिळताच उरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. मुलगी ही अंत्री येथे काँन्व्हेट स्कूलमध्ये नोकरी करत होती. तर मुलगा हा वाहन चालकाची नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, दोन्ही कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळे दोघेही प्रचंड मानसिक तणावात होते. हे दोघेही खूप कष्टाळू आणि मेहनती होते, एकमेकांवर जीवापाड प्रेम असल्यावरही लग्नाला नकार मिळत होता.
    Maharashtra TimesBeed Crime : जुनी भांडणं काढत कुऱ्हाडीने हल्ला, मध्यस्थी करणाऱ्याच्या मांडीवर हातोड्याचे घाव… बीडमध्ये खळबळ

    लेकरांच्या विरहाची वेदना

    प्रत्येकजण नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवी संकल्पना घेऊन सुरुवात करत असतात. मात्र, कुटुंबाचा लग्नास नकार या दोघांनी असल्यानं रेल्वेखाली उडी घेऊन त्यांच्या प्रेमासह आयुष्य आणि कुटुंबाचा विरोधही संपवला. विरोध केल्यानंतर कुटुंबाच्या हाती उरली फक्त मुलांच्या विरहाची वेदना. लग्नाला विरोध केल्यानं या प्रेमी युगुलांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेनं शेळद गावात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास उरळ पोलीस ठाणेदार पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.
    Maharashtra TimesBuldhana Accident : नववर्ष निमित्ताने घरी आला, शेतात गेला असता अनर्थ, ट्रॅक्टरखाली अडकून अभिजितचा करुण अंत; आई-वडिलांचा हंबरडा

    मारहाणीत जीवलग मित्रालाच संपवलं

    अकोला शहरात पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली असून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संजय नगर परिसरात एका 35 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. अमोल दिगंबर पवार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. हत्या झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 48 तासांत एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेली ही दुसरं हत्याकांड आहे. या प्रकरणातील आरोपी नितेश अरुण जंजाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा