ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज छाननीदरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ. मनसे नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेवर उपस्थित केलेले गंभीर प्रश्न चर्चेत.
“निवडणूक अधिकाऱ्यांनी केला भेदभाव!”
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अविनाश जाधव यांनी निवडणूक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केला आहे. नियमानुसार अर्जांची छाननी झाल्यानंतर ते अर्ज कार्यालयात तत्काळ डिस्प्लेला लावणे बंधनकारक असते. मात्र, काल साडेतीन वाजेपर्यंत हे अर्ज लावण्यातच आले नाहीत. हा लपवाछपवीचा प्रकार संशयास्पद आहे.”, असं जाधव म्हणाले.
Murlidhar mohol: निवडणूक होण्याआधीच पुण्याच्या महापौरपदाबाबत मंत्री मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य
शिंदे गटाला झुकतं माप? जाधवांचा थेट सवाल
अविनाश जाधव यांनी थेट शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांवर निशाणा साधला. “निवडणुकीचा नियम सांगतो की अर्जातील एकही रकाना रिकामा राहता कामा नये, अन्यथा अर्ज बाद होतो. शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांनी अर्ज अपूर्ण भरले असतानाही त्यांचे अर्ज वैध ठरवण्यात आले. मग तोच न्याय आमच्या उमेदवारांना का नाही?” असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.
“आमच्या उमेदवारांची काय चूक?”
मनसेच्या एका महिला उमेदवाराचे उदाहरण देताना जाधव भावूक आणि संतप्त दिसले. ते म्हणाले, “आमच्या महिला उमेदवार सकाळी ११ च्या आधीच कार्यालयात पोहोचल्या होत्या. मात्र, तिथे निवडणूक अधिकारी चहा-पाणी करण्यात व्यस्त होते. तरीही वेळेत हजर न राहिल्याचे कारण देत त्यांचा अर्ज फेटाळला गेला. एखाद्या कार्यकर्त्याचे संपूर्ण करिअर निवडणूक यंत्रणेने एका फटक्यात उद्ध्वस्त केले आहे.
कार्यकर्त्यांनी आयुष्यभर मेहनत करायची आणि पोचपावती मिळण्याची वेळ आली की त्यांचे अर्ज बाद करायचे? मग आम्ही निवडणूक लढवायची की नाही?”
