संभाजीनगरमधील युतीच्या स्थितीवर संजय शिरसाट यांनी केलेल्या भाष्यामुळे महायुतीतील नाराजी, कार्यकर्त्यांची भूमिका आणि पुढील राजकीय दिशा चर्चेत आली आहे.
संभाजीनगरमध्ये आता युती शक्य नाही!
संभाजीनगरमधील स्थानिक युतीबाबत बोलताना शिरसाट यांनी अत्यंत कडक भूमिका मांडली. ते म्हणाले, “येथे आता युती पूर्णपणे तुटली आहे. या परिस्थितीत पुन्हा युती करण्याचा प्रयत्न केला तर कार्यकर्त्यांमध्ये ‘डोकेफोडी’ होईल. स्थानिक नेत्यांनी आणि भाजपने ही युती तोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत.” यावेळी त्यांनी काही कागदपत्रांचे पुरावे देखील माध्यमांना दाखवले.
Pooja More: भाजपकडून तिकीट मिळालं, पण नशिबानं साथ दिली नाही; अर्ज मागे घेतला अन् पूजा मोरे ढसाढसा रडल्या, म्हणाल्या ‘मी हिंदू मुलगी…’
उमेदवारांची नाराजी आणि कार्यकर्त्यांचा हक्क…
यावेळी पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, “अनेक ठिकाणी दोन उमेदवारी अर्ज भरल्या गेले, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. जो कामाचा माणूस असतो त्याला उमेदवारीची अपेक्षा असते. अशा वेळी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्यापासून पळ काढणे चुकीचे आहे.”
ठाकरे बंधू आणि संजय राऊतांवर निशाणा….
यावेळी बोलताना संजय शिरसाठांनी ठाकरे बंधूंवरही घणाघात केला आहे, त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभांच्या पॅटर्नवर टीका करताना शिरसाट म्हणाले, “मुंबई कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, ती सर्वांची आहे. एक सभा घ्यायची आणि मुंबई तोडू देणार नाही असे बोलायचे, ही यांची जुनी पद्धत आहे.”
तसेच संजय राऊत यांच्यावर टीका करताना, “त्यांना फक्त हजारो कोटींचे स्वप्न पडतात. लोकसभेत ज्यांनी तिकिटे विकली, तेच आता भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
