• Tue. Mar 10th, 2026
    Mumbai Local: वर्षअखेरच्या रविवारीही मुंबईकरांचा खोळंबा! पश्चिम रेल्वेवर 333 लोकल रद्द; कसे असेल नियोजन? पाहा वेळापत्रक

    Western Railway Mega Block: २०२५मधील शेवटच्या रविवारी पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

    mumbai local news.(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : कांदिवली आणि बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी बोरिवली स्थानकात ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे आज, रविवार आणि सोमवारी एकूण ३३३ लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. यामुळे वर्षातील शेवटच्या रविवारी कुटुंबीयांसह रेल्वेप्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

    भूसंपादनामुळे रखडलेल्या मुंबई सेंट्रल ते बोरिवली पाचवी-सहावी मार्गिका उभारणीचे काम सध्या सुरू आहे. प्रकल्पातील शेवटचा टप्पा अर्थात कांदिवली ते बोरिवलीदरम्यान ३.७ किमी मार्गावर रूळउभारणी आणि यांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी २१ डिसेंबर ते १८ जानेवारीपर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. आज, रविवारी १२० अप व ११५ डाऊन अशा एकूण २३५ आणि सोमवारी ९८ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.
    Maharashtra TimesMumbai News: कबुतरखान्यावर दाणे टाकणे भोवले! हायकोर्टाने दोषी ठरवून ठोठावला 5 हजारांचा दंड
    शनिवारी ब्लॉकच्या कामांमुळे २९६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. याव्यतिरिक्त २९ डिसेंबरला बोरिवलीतील फलाट क्रमांक-८ आणि ९ हे प्रवासी वापरासाठी बंद राहणार आहेत. परिणामी बोरिवली – अंधेरीतून सुटणाऱ्या हार्बर लोकल गोरेगावपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे उपनगरी रेल्वेसह डहाणू रोड-बोरिवली मेमू आणि लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांवरदेखील परिणाम होणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यात बदल करण्यात आला असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    Maharashtra TimesMumbai Crime: ‘थर्टी फर्स्ट’च्या आधीच मुंबईत मोठी कारवाई; तब्बल 36 कोटींचे हेरॉइन जप्त, नऊ अटकेत
    बोरिवलीपर्यंत सहावी मार्गिका पूर्ण होत असताना मुंबई सेंट्रल ते खारदरम्यान अतिक्रमणांमुळे अडथळे कायम असून, यामुळे माहीम ते खारदरम्यान पाचवी मार्गिका उभारणे शक्य झालेले नाही. पश्चिम रेल्वेने सन १९९३मध्ये मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान आणि सन २००२मध्ये सांताक्रूझ आणि बोरिवलीदरम्यान पाचवी मार्गिका सुरू केली होती. मात्र, रेल्वे जागेतील अतिक्रमण आणि मतपेढीच्या राजकारणामुळे अखंड पाचवी मार्गिका उभारण्यात आलेली नाही.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा