सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाही. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. शेतकऱ्यांनी ऊसाची पहिली उचल….
उसाची पहिली उचल ३,४०० रुपये जाहीर करावी, अशी मागणी करत शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन कारखान्याच्या गेटवर आंदोलन केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, सोलापूरच्या मतदारसंघातील खासदार प्रणिती शिंदें यांनी केंद्रीय संसदेत एक शब्दही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उचलला नाही. ही खूप मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Badlapur Local: प्रचंड गर्दी अन् रेटारेटीत लोकल प्रवास करणाऱ्या बदलापूरकरांना दिलासा नाहीच, रेल्वेचे उत्तर वाचले का?
विधानसभेतही सोलापूर जिल्ह्यातील अनेक आमदारांनी शेतकऱ्यांसाठी कोणताही लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला नाही. यावेळी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी आरोप केला की, आमदार असो किंवा खासदार असो, त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे नाही. त्यांचा फक्त साखर कारखान्यांच्या पोसणावर लक्ष केंद्रित आहे, अशी टीका विजय रणदिवे आणि मोहसीन पटेल यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विजय रणदिवे म्हणाले की, ऊस कायदा १९६६ नुसार ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत बिल जमा करणे बंधनकारक आहे. परंतु सध्या ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्यापेक्षा अधिक वेळ उलटला असूनही ऊसदर जाहीर केलेला नाही. शेतकऱ्यांना पहिली उचल ३,४०० रुपये देण्यात यावी, अशी मागणी करत संघटनेने आंदोलन केले आहे.
या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा सार्वजनिक समोर आल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जोरदार आक्रोश व्यक्त करत कारखान्यांना आपले हक्क त्वरित देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा हा रोष आणि कारखान्यांविरुद्धचा दबाव पुढील दिवसांत अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
