Buldhana Accident News : तेलंगणातून जळगाव खान्देश येथे विवाह सोहळ्यासाठी निघालेले पती-पत्नी बेपत्ता झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कारसह विहिरीत मृतावस्थेत आढळले. या अपघाताचे कारण समोर आले आहे.
याबाबत घटनाक्रम असा की तेलंगणातील सूर्यपेठ जिल्ह्यातून कारणे विवाह सोहळ्यासाठी जळगाव खान्देश येथे जाणारे पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील पद्मसिंह दामू पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता पाटील हे दाम्पत्य राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी शिवारातून 27 नोवेंबर रोजी सायंकाळी रहस्यमिरता बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद देखील करण्यात आली होती. नांदुरा पोलीस या बेपत्ता दाम्पत्याचा शोध घेत असताना 29 नोव्हेंबर रोजी दुपारी वडनेर भोलजी नजीक महामार्गावरील विश्वगंगा हॉटेल जवळ वळण मार्गावर रस्त्याच्या कडेला झाडाझुडपामध्ये असलेल्या एका पडक्या विहिरीत कार सह या दोघांचेही मृतदेह आढळून आले होते. यानंतर मृतात पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ संदीप पाटील व त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी च्या परिसरात असलेल्या हॉटेल विश्व गंगा येथील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. वडनेर कडून मलकापूर कडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने कारला कट मारल्यामुळ अनियंत्रित होऊन कार रस्त्याला लागूनच असलेल्या विहिरीत जाऊन पडल्याचे स्पष्ट झाले.
Buldhana Crime : लक्ष्मीच्या मनातही आलं नाही, नवरा रात्री असं काही करेल, रागाच्या भरात बोलली पण रात्री जे घडलं त्याने बुलढाणा हादरलं
यामुळे दोघांच्या मृत्यूलाअज्ञात वाहन चालक जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध दहा डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. मृत पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ संदीप रमेश पाटील (वय वर्ष 50, रा. वाघुळखेडा ता. पाचोरा) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम 281 106 बी एन एस सह कलम 119 134 अन्वये होण्याची नोंद केली आहे याप्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.
Buldhana Crime: ‘प्रॅक्टिकलचे मार्क वाढवून देतो!’ एकटीला भेटायला बोलवलं अन्…, शिक्षकाचं विद्यार्थिनीसोबत घृणास्पद कृत्य
अज्ञात वाहनाच्या कटने सर्वकाही संपले
ज्या लग्न समारंभाकरता चालले होते त्याकरता फक्त एक विरुद्ध दिशेने येणारी वाहन आणि त्यांनी मारलेला कट कारणीभूत ठरला. त्यामुळे अपघाताच्या दिवसापासून नेमकं हा घातपात आहे का? हे घडलं तरी कसं कारण की काही वेळापूर्वीच फोनवर संभाषण झाल्यानंतर हे दोघं दाम्पत्य नॉट रिचेबल झालेले ? या सर्व घटनाक्रमाचा उलगडा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला आहे.
