• Sat. Jun 6th, 2026
    केदारनाथच्या पुरातून वाहत महाराष्ट्रात, येरवड्यात उपचार; गुगलवर गाव शोधलं अन् 10 वर्षांनी शिवम कुटुंबाला भेटले

    Kedarnath Flood Survivor found in Pune : केदारनाथ येथे २०१५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शिवम वाहून आले, नातेवाइक आणि पोलिसांनी प्रयत्न करूनही ते सापडले नव्हते

    शिवमची पुनर्भेट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे/छत्रपती संभाजीनगर : उत्तराखंडमधून १० वर्षांपूर्वी पुरात वाहून महाराष्ट्रात आल्यावर एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथे मंदिरात पुजारी म्हणून काम करू लागली. या काळात मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्यांनी त्यांचे नाव घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या दरम्यान मानसिक संतुलन बिघडल्याने पोलिसांनी उपचारासाठी त्यांना २०२१ मध्ये येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चार वर्षे त्याच्यावर उपचार करून बरे केले. त्यांच्याकडून घर, गाव आणि शाळेची माहिती काढून घेतली. रुग्णालयाने नातेवाइकांशी संपर्क साधल्यावर वर्षांनंतर बेपत्ता झालेले ते मिळाल्याने कुटुंबाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. रुग्णालयाने त्यांच्यावर दाखल झालेला चोरीचा खोटा गुन्हा न्यायालयाच्या आदेशाने मागे घेण्यात यश मिळविले.

    शिवम असे त्यांचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या काळात त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने त्याला २७ ऑक्टोबर २०२१ रोजी येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले. उपचाराच्या काळात समाजसेवा अधीक्षक रोहिणी भोसले या त्यांच्याशी संवाद साधून माहिती जाणून घेत होत्या. या वेळी त्यांना इर्जिन गावाचे नाव कळाले. ‘गुगल’वरून माहिती काढून त्यांनी स्थानिक पोलिसांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यानंतर नातेवाइकांशी संपर्क झाला.
    Maharashtra TimesGoa Night Club Fire : साखरपुडा रविवारी ठरणार होता, आदल्याच रात्री नियतीने स्वप्नं पुसली, 21 वर्षीय तरुणाचा आगीत मृत्यू
    केदारनाथ येथे २०१५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शिवम वाहून आले होते. नातेवाइक आणि पोलिसांनी प्रयत्न करूनही ते मिळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात आल्यावर वैजापूरमध्ये ते एका मंदिरात राहू लागले आणि देवाची सेवा करू लागले. तेथे ते पुजारी झाले. २०१५ मध्ये मंदिरातील काही साहित्याची चोरी झाल्यावर चोरट्यांनी त्यांचे नाव घेतले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

    पुणे-नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेप्रकरणी शिंदेंचे आमदार आक्रमक; अमोल खताळ यांची विधानभवनात निदर्शने

    मागील आठवड्यात शिवम यांना मानसिक आजार आणि गुन्ह्यातून मुक्त करून दहा वर्षांनंतर कुटुंबाच्या स्वाधीन केले, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले.
    Maharashtra TimesWoman Dangles from Balcony : पळ पळ, माझी बायको आली… प्रेयसीशी रोमान्स करताना बायको घरी, तरुणी दहाव्या मजल्याच्या बाल्कनीत लटकली अन्…
    चोरीचा आळ घेतल्याचा आघात सहन न झाल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले. त्या वेळी पोलिसांनी त्यांना येरवडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; पण येरवडा मनोरुग्णालयातील डॉक्टर आणि समाजसेवा अधिकाऱ्यांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शिवम यांना बरे करण्यात आणि त्यांचा पत्ता शोधून काढण्यात यश मिळाले. मंदिरातील चोरी प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे त्यांनी समाजसेवा अधीक्षकांना सांगितले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा