• Sun. Jun 7th, 2026

    बोरिवली ते नाशिक प्रवास सुस्साट! ‘समृद्धी’मार्गे ST महामंडळाची नवी ई-एसी बससेवा सुरु, पाहा वेळापत्रक

    बोरिवली ते नाशिक प्रवास सुस्साट! ‘समृद्धी’मार्गे  ST महामंडळाची नवी ई-एसी बससेवा सुरु, पाहा वेळापत्रक

    Nashik To Borivali AC E- Bus Timetable: बोरिवली-नाशिक-बोरिवली ई-एसी बस ऑनलाइन आरक्षणासाठीही उपलब्ध आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

    E-AC bus(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : पश्चिम उपनगरातून नाशिकमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना आता राज्य परिवहन (एसटी) मंडळाच्या ई-वातानुकूलित नव्या बसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. बोरिवली ते नाशिकदरम्यान नवी ई-एसी बस महामंडळाने सुरू केली आहे. ही बस मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून जाणार असल्याने प्रवाशांच्या प्रवास वेळेत बचत होणार आहे.

    दादर-पुणे, नाशिक-छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ नाशिक-बोरिवली मार्गावर ई-एसी बस सुरू करण्याची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. बोरिवली-नाशिक आणि नाशिक-बोरिवलीदरम्यान एकूण २२ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या बसगाड्यांनुसार आणखी फेऱ्या वाढवण्याचे महामंडळाच्या वाहतूक विभागाचे नियोजन आहे.
    Maharashtra Timesमुंबईकरांसाठी महत्त्वाचे! AC लोकलने प्रवास करताय? जाणून घ्या नवा नियम, अन्यथा भरावा लागेल दंड
    महिला सन्मान योजनेअंतर्गत बोरिवली-नाशिक एसी प्रवास महिलांना २६६ रुपयांत करता येणार आहे. पुरुष प्रवाशांसाठी ५०९ रुपये तिकीट असणार आहे. बोरिवलीवरून नाशिकसाठी पहिली बस पहाटे ५ वाजता आणि शेवटची बस सायंकाळी ५ वाजता असेल. नाशिकहून बोरिवलीसाठी पहिली बस सकाळी ६ वाजता, शेवटची बस सायंकाळी साडेपाच वाजता असणार आहे.

    बोरिवली-नाशिक-बोरिवली गाड्यांच्या वेळा
    बोरिवली ते नाशिक:
    पहाटे ५.००, ७.००, ८.००, ९,००, १०,००, ११.००,
    दुपारी १२.३०, १.३०, २.३०, ३.३० आणि
    संध्याकाळी ५.००
    नाशिक ते बोरिवली: पहाटे ६.००, ७.००, ८.००, ९.००, १०.००,
    दुपारी १२.३०, १.३०, २.३०, ३.३०, ४.३० आणि
    संध्याकाळी ५.३०

    Maharashtra TimesWestern Railway: प्रभादेवी स्थानकात लोकल थांब्यात बदल; गर्दी विभागण्यासाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय
    बसप्रवासात बोरिवली मार्गावर पडघा ते इगतपुरीदरम्यान लांब अत्याधुनिक बोगदे, व्हायाडक्टसारख्या उच्च वाहतूक सुविधांचा अनुभव घेणे हा अविस्मरणीय अनुभव होता. गर्दीमुक्त रस्त्यावरून सुसाट जाता आल्याने प्रवासाचा एक ते दीड तास कमी झाला. – रोहित मठकर, प्रवासी

    आम्ही फक्त चार तासांत बोरिवलीहून नाशिकला पोहोचलो. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे बसचा वेग कमी झाला. या खड्ड्यांची दुरुस्ती झाल्यास हा वेळ आणखी वाचेल व प्रवास अधिक जलद होईल. –सरला जाधव, प्रवासी

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा