• Tue. Mar 10th, 2026
    पृथ्वीबाबा आधी म्हणाले मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो; आता म्हणतात, शेवटी आपल्या देशात संपूर्णपणे…

    Contributed by: सुधीर पाटीलAuthored by: अनिश बेंद्रे|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    Prithviraj Chavan on Local Body Election Results : सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळं होतं, परंतु नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात कोर्टात केस चालू असताना सरकारी वकील झोपले होते का? असा खरमरीत सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

    पृथ्वीराज चव्हाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : नगरपालिका निवडणुकांचे निकाल आता ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबरला होणार आहेत. सोळा, सतरा दिवस ईव्हीएमच्या पेट्या गोदामात ठेवल्या जातील. पेट्यांमध्ये काही घालमेल करायची असेल तर सरकारला त्यासाठी भरपूर वेळ मिळेल, असा थेट हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

    नगरपालिका निवडणुकांचे निकाल पुढे ढकलल्याचा न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोग किती अक्षम्यपणे काम करतोय ते या घटनेतून स्पष्ट होतंय. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर मी कालच बोललो. आता निकाल देखील ३ डिसेंबर ऐवजी २१ डिसेंबरला लागणार आहे. सोळा, सतरा दिवस मतपेट्या गोदामात ठेवल्या राहतील. पेट्यांमध्ये काही घालमेल करायची असेल तर सरकारला त्यासाठी भरपूर वेळ मिळेल. यामुळे लोकांचा या प्रक्रियेवरील विश्वास उडत चालला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    ते पुढे म्हणाले की, सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळं होतंय. परंतु, नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात कोर्टात जी केस चालली होती, त्यावेळी सरकारी वकील झोपले होते का? त्यामध्ये सरकारच्या वकिलाने प्रभावीपणे बाज मांडायला पाहिजे होती. आम्हाला तातडीने निकाल हवा आहे, अशी बाजू मांडायला पाहिजे होती. मग, हे निकाल पुढे गेले नसते. ती बाजू मांडायला सरकारला अपयश आलं.
    Maharashtra TimesPune Crime : अहो चला ना आपण… नवरा दूर-दूर, पुण्यातील विवाहितेचाच शरीरसंबंधासाठी पुढाकार, शेवटी त्याने तिच्या गुप्तांगात…
    या प्रकरणात निवडणूक आयोगाला दोष देऊन आता काही उपयोग नाही. कारण, हा निकाल न्यायालयाने दिलेला आहे. जोपर्यंत जनता जागृत होत नाही, तोपर्यंत हळूहळू असंच होत राहणार. शेवटी या देशात आपल्याला लोकशाही नाही तर संपूर्णपणे हुकुमशाही आलेली दिसेल, अशी भीतीही पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
    Maharashtra TimesJay Pawar : मुंबई-पुण्यात नव्हे, जय पवारांचं लग्न ‘या’ देशात, शाही सोहळ्यात फक्त 400 पाहुणे, राष्ट्रवादीतून दोघंच निमंत्रित

    मराठी पंतप्रधानावरुन भाष्य

    दोनच दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, एपस्टाईन फाइल्सवरुन अमेरिकेत गेल्या 6 महिन्यांपासून मोठा गदारोळ सुरु आहे. ही फाईल उघड झाल्यानंतर भारतीय राजकारणावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. कदाचित मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. यासंदर्भातील ‘एक्स’ पोस्ट शेअर करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला देखील टॅग केले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा