• Fri. Mar 6th, 2026

    Raigad Crime : डोक्यापासून छातीपर्यंत जखमा, रक्ताने माखलेल्या लाकडी पट्ट्या; हिराबाई जोशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा

    Raigad Crime : डोक्यापासून छातीपर्यंत जखमा, रक्ताने माखलेल्या लाकडी पट्ट्या; हिराबाई जोशी मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा

    Raigad Crime : रायगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उरण तालुक्यातील हिराबाई जोशी यांच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.

    उरण वृद्ध महिला हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : उरण तालुक्यातील मोठे भोम गावात 9 नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत आढळलेल्या 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांच्या मृत्यूनं परिसरात खळबळ उडवली आहे. प्राथमिक तपासात उरण पोलिसांनी हे स्पष्ट केलं की, हिराबाईंचा मृत्यू नैसर्गिक नसून बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे.

    डोक्यापासून छातीपर्यंत जखमा

    घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार हिराबाईंच्या शरिरावर टणक वस्तूने मारहाण केल्याचे चिन्ह स्पष्ट दिसून आले. डोक्यापासून छातीपर्यंत तसेच हात-पायांवर अनेक गंभीर जखमा असून, घटनास्थळी सापडलेल्या रक्ताने माखलेल्या दोन तुटलेल्या लाकडी पट्ट्या हत्येच्या क्रूर स्वरूपाला अधोरेखित करतात.
    Maharashtra Timesमालाडच्या मालवणीत भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक, अस्लम शेख यांच्या विरोधात रोष

    जमिनीतून मिळालेल्या पैशांतून वाद

    प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, हिराबाई यांनी विकलेल्या चार गुंठे जमिनीतून मिळालेल्या 15 लाख पैकी पाच ते सहा लाख रुपये नातेवाइकांना दिले होते. पैशांच्या वाटपावरून निर्माण झालेल्या वादामुळे नातेवाइकांपैकी कुणीतरी हत्येमागे असण्याची शक्यता अधिक बळावली आहे. पोलीस त्या दिशेने सखोल चौकशी करत आहेत. या घटनेमुळे उरण परिसरात नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे. स्थानिकांनी आरोपींचा लवकर शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उरण पोलीस हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तपास करत असून, सर्व शक्य ती चौकशी सुरु आहे.

    Maharashtra TimesNanded Crime : भरगच्च पगार, साडे पाच हजार रुपयांसाठी लाज सोडली; लाच घेताना महिला नायब तहसीलदारास अटक

    घटनेचं गूढ कायम

    जिल्हा पोलीस अधिकारी हनीफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी त्वरित पुरावे गोळा करत आहे. सध्या या घटनेचं गूढ कायम असून, ही घटना अपघात आहे की हत्येची कहाणी, याचं उत्तर शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालानंतर स्पष्ट होईल. उरण तालुक्यातील मोठे भोम गावातील या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिक लोक सखोल तपास करून न्याय मिळावा, अशी अपेक्षा करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा