रायगडच्या नगोठण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका दूध विक्रेत्याने व्यवसायातून झालेल्या कर्जाबाजारीपणामुळे स्वत:ला संपवून घेतलं आहे. या घटनेची सध्या रायगड जिल्ह्यात चर्चा होत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : नागोठण्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका दूध व्यवसायिकाने कर्जाच्या ओझातून नैराश्यात जावून स्वत:ला संपवून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खरंतर व्यवसायात नुकसान होणं किंवा कर्जबाजारी होणं या गोष्टी होत असतात. पण यामुळे स्वत:ला संपवून घेण्याचं टोकाचं पाऊल उचलणं चुकीचं आहे. कारण मेहनत केल्याने गोष्टी बदलतात. वेळ नेहमी सारखी नसते. त्यामुळे व्यवसायातून नुकसान झालं किंवा कर्जबाजारी झालं तरी अशाप्रकारचा टोकाचा निर्णय घेऊ नये, असं नागरिकांचं म्हणणं आहे. कारण आपलं कुटुंब आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. या कुटुंबाचा विचार आपण करायला हवा, अशी भावना आता सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
नागोठण्यातील आंगर आळी भागात गुरुवारी (दि. 20) रात्री साडेसात ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 52 वर्षीय महेश अशोक नलावडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस तपासानुसार, महेश नलावडे हे दूध डेअरी व्यवसायाशी संबंधित होते आणि दीर्घकाळ व्यवसायातील आर्थिक ताण, नुकसान आणि कर्जामुळे नैराश्यात होते. व्यवसायातील आर्थिक अडचणी आणि वाढत्या कर्जाचा ताण महेश यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करत होता, असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांची माहिती गोळा केली आहे. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दया पाटील करत आहेत.
स्थानिक नागरिकांनी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. लहान व्यवसायातील आर्थिक ताणामुळे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, व्यवसायातील कर्ज, नुकसान आणि आर्थिक ताणामुळे मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे वेळेत मार्गदर्शन आणि मानसिक सहाय्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
महेश नलावडे यांचा मृत्यू दूध डेअरी व्यवसायातील आर्थिक अडचणींमुळे झाला असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे स्थानिक समाजात व्यवसायिक आणि नागरिकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात अशा घटनांपासून बचावासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संघटनांनीही या घटनेतून धडा घेऊन, लहान व्यवसायिकांसाठी आर्थिक आणि मानसिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली आहे. नागोठणे परिसरात दूध डेअरी व्यवसायाच्या आर्थिक ताणांबाबत गंभीर चर्चा सुरु झाली असून, नागरिकांनी सतत मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा