• Mon. Mar 16th, 2026
    Hingoli Crime : नवरा-बायकोमध्ये सतत वाद, ‘पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत?’ विचारल्यावर सासरा अन् मेव्हण्याने जावयाला संपवलं

    Hingoli Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच भटसावंगी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरा आणि मेव्हण्याने आपल्याच जावयाची दगडाने ठेचून हत्या केली आहे.

    जावयाची दगडाने हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    गजानन पवार, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील भटसावंगी येथे पत्नीला नांदावयास का पाठवत नाही? या कारणावरून झालेल्या वादातून जावयाचा दगडाने हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बासंबा पोलिसांनी याप्रकरणी सासरा व मेव्हण्यावर गुन्हा नोंदवत दोघांना यवतमाळ जिल्ह्यातून ताब्यात घेतलं आहे. हरिदास सिताराम चौरे (वय 33, रा. भटसावंगी) याचा विवाह वर्षा कपाटे हिच्यासोबत सात वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नीतील किरकोळ वादामुळे वर्षा मागील काही दिवसांपासून माहेरी राहत होती. याबाबत चर्चा करण्यासाठी दि. 19 नोव्हेंबर रोजी हरिदास घरासमोर उभा असताना सासरे साहेबराव कपाटे व मेव्हणा गोलू कपाटे हे त्याला भेटले.

    ‘पत्नीला नांदावयास का पाठवत नाही? अशी विचारणा हरिदासने केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढताच हाणामारी झाली आणि संतापलेल्या आरोपींनी दगडाने हरिदासच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर वार केले. यात हरिदासचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दोघे घटनास्थळावरून फरार झाले होते. माहिती मिळताच बासंबा पोलिसांची टीम घटनास्थळी धावली. मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. ‌पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती देण्याचे निर्देश दिले.

    Maharashtra TimesKolhapur Crime : माझ्याकडे सुप्तशक्ती, भोंदूबाबा सनी भोसलेने विवाहितेला पळवून नेलं, घरात कंडोमची पाकिटं सापडली अन्…

    सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या पथकाने तपासचक्र फिरवीत अवघ्या दोन तासात यवतमाळ जिल्ह्यातून दोन्ही आरोपींना अटक केली. दत्ता चवरे यांच्या फिर्यादीवरून साहेबराव कपाटे आणि गोलू उर्फ शत्रुघ्न कपाटे (रा. भटसावंगी) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. शवविच्छेदनानंतर हरिदासच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

    जिने जन्म दिला तिच्यासोबतच 5 व्या वर्षीच करुण अंत

    काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात एक धक्कादायक घटना घडली होती. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आई व मुलाचा मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आले होते. ज्योती सागर सावळे असं 30 वर्षीय मृत महिलेचं नाव असून राजवीर सागर सावळे असं 5 वर्षीय मुलाचं नाव आहे.

    Maharashtra TimesMalegaon News : चिमुकलीवर अत्याचार, मालेगावात मोर्चेकरी आक्रमक, कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांसोबत धुमश्चक्री

    मिळालेल्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी गावकऱ्यांना तलावात आई आणि मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा