अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन मोठा ट्विस्ट आला होता. पण आता विरोधात अर्ज दाखल करणाऱ्या उज्जवला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : राज्यात चर्चेत आलेली ‘अनगर नगरपंचायत’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मागील अनेक वर्षांपासून अनगर ग्रामपंचायत आणि सद्यस्थितीत नगर पंचायत बिनविरोध होत होती. माजी आमदार तथा भाजप नेते राजन पाटील यांचं वर्चस्व असलेली संपूर्ण अनगर नगरपंचायत बिनविरोध करण्यासाठी त्यांनी तयारी केली होती. मात्र गावातील उज्ज्वला थिटे या महिलेने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरून राजन पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा दिला होता. कडेकोट बंदोबस्त आणि शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीचा अर्ज भरला होता. पण उज्ज्वला थिटे यांचा अर्ज छाननी बाद झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. सूचक यांची सही नाही, असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी हा आक्षेप ग्राह्य धरून अर्ज बाद ठरविले आहे. विशेष म्हणजे उज्ज्वला थिटे या सुनावणीस उपस्थित नव्हत्या.
विरोधकांनी एकूण पाच हरकती घेतल्या
मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी दुपारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात अर्ज छाननी झाली. त्यावेळी उज्ज्वला थिटे या उपस्थित नव्हत्या. विरोधकांनी एकूण पाच हरकती घेतल्या होत्या. त्यामधील दोन महत्वाच्या हरकतींची दखल घेत अर्ज बाद ठरविण्यात आला आहे.
विरोधकांच्या हकरत
1) उज्ज्वला थिटे यांनी चुकीचा प्रभाग नोंद केला
2) मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे
3) वयाचा पुरावा दिला नव्हता
4) उमेदवारी अर्ज भरताना सूचकाची सही नाही
5) सुचकाचा मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे
राज ठाकरेंनी बैठकीतच झापले, पिट्या भाईने थेट कमळ हाती घेतले
‘या’ एका चुकीमुळे उज्ज्वलला थिटेंचा अर्ज बाद
निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला थिटेंच्या विरोधात विरोधकांनी घेतलेल्या काही हरकती या किरकोळ स्वरूपाच्या होत्या. उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्जात प्रभाग क्रमांक त्यांनी 5 नमूद केला होता. मात्र उज्ज्वला थिटे यांचा प्रभाग क्रमांक 4 आहे. उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्जात माहिती भरताना मतदार यादीत अनुक्रमांक 1042 असा नमूद केला होता. मात्र त्यांचे नाव प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुक्रमांक 217 दिसून आले. वयाचा पुरावा जोडला नव्हता. उज्ज्वला थिटे यांनी फक्त वय नमूद केले होते. या हरकती किरकोळ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी तांत्रिक स्वरूपाच्या हरकती आहेत म्हणून विचारत घेतल्या नव्हत्या. महत्वाची हरकत म्हणजे सूचकची सही नव्हती. उमेदवारी अर्ज भरताना सूचकाची सही आणि उमेदवाराची सही महत्वाची असते, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. सुचकाची सही नसल्याने उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरविला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा