Marathwada Farmers Death Cases: शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारी स्तरावर विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, असे असतानाही शेतकरी आत्महत्यांचे सत्र कायम असल्याचे विदारक चित्र आहे.
मराठवाड्यात सर्वदूर सिंचनाची सोय नाही. कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने शेतकरी निसर्गावरच अवलंबून आहेत. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान, तर कधी मालाला भाव नाही. त्यामुळे बिघडलेली आर्थिक गणिते, अशा या चक्रात शेतकरी सापडला आहे. या व इतर कारणांमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे विदारक चित्र आहे.
Chhatrapati sambhaji nagar: गाझातल्या युद्धग्रस्तांना मदत पाठवण्याच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? लाखो रुपये ट्रान्सफर, एटीएसने एकाला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडतंय?
यंदाही उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला. सोबतच काही भागात गारपिटीसह अवकाळी पावसाने पिकांना फटका बसला. खरीप हंगामात अतिवृष्टी, पूर यामुळे मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांच्या नुकसानपोटी शासनाने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी मदतनिधी घोषित केला असून, अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, जानेवारी ते ऑक्टोबरअखेरपर्यंत मराठवाड्यातील ८९९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वाधिक म्हणजे २०० आत्महत्येच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७१ जणांनी, तर नांदेड जिल्ह्यात १४५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. धाराशिव जिल्ह्यात ११५, जालना ५८, परभणी ९०, हिंगोली ५३, लातूर जिल्ह्यात ६७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
१०२ प्रकरणे मदतीसाठी अपात्र
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत ५६० प्रकरणे शासनाच्या आर्थिक मदतीसाठी पात्र ठरली आहेत. २३७ प्रकरणे चौकशी वा निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. १०२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
Chhatrapati sambhajinagar: भाजपने गमावलेला बडा नेता करणार घरवापसी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडणार प्रवेश
गतवर्षी ९८४ आत्महत्या
मागील वर्षभरात (१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४) मराठवाड्यातील तब्बल ९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात नमूद आहे. यात बीड जिल्ह्यात जिल्ह्यात सर्वाधिक २०५ आत्महत्यांची नोंद झाली. त्या पाठोपाठ नांदेड जिल्ह्यात १६७, तर छत्रपती संभाजीनगरात १५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या
विभागातील शेतकरी आत्महत्या
महिना —शेतकरी आत्महत्या
जानेवारी —८८
फेब्रुवारी —७५
मार्च —११०
एप्रिल —८९
मे —७७
जून —८५
जुलै —१०७
ऑगस्ट —७६
सप्टेंबर —८३
ऑक्टोबर —१०९
एकूण —८९९

