राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नांवर दिनेश वाघमारे यांनी उत्तर देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला.
विरोधकांचा आरोप आहे की, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे. त्याबाबत काय सांगाल? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलं. हे चुकीचं आहे. असं निवडणूक आयोग कुणाच्या दबावाखाली काम करत नाही, असं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले.
पत्रकारांचे प्रश्न : विरोधकांचे आक्षेप आहेत की, एका घरामध्ये 40 पेक्षा जास्त मतदार नोंदले गेले आहेत. चुकीचे पत्ते आहेत. ते दुरुस्ती करण्यासाठी काय पावलं उचलणार? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलं.
आयुक्तांचं उत्तर : आम्हाला मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मिळते. या यादीत दुबार आणि तिबार मतदानाबद्दल कारवाई करता येते. ती कारवाई आम्ही केली आहे. काही मिस्टेक असतील त्या आम्ही दुरुस्त केले आहेत. प्रभाग चुकला असेल तर ते सुद्धा आम्ही दुरुस्त करत आहोत. विधानसभेच्या मतदार यादीत नाव आहे, पण या मतदार यादीत नाही. तर ते सुद्धा नाव आम्ही टाकतोय, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं.
प्रश्न: विरोधकांचे मतदान होऊ देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यावर काय सांगाल?
उत्तर : मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आम्ही कॅम्पेन करत आहोत. आमच्या स्तरावर जेवढी मतदार यादी स्वच्छ करता येईल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करत आहोत. जिथे एका घरावर जास्त मतदार दाखवले आहेत त्यावर केंद्रीय निवडणूर आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे
प्रश्न : पैसै वाटप, मद्य वाटप रोखण्यासाठी काय करणार?
उत्तर : आम्ही आचारसंहितेची ऑर्डर काढली आहे. त्यामध्ये मद्य आणि पैशांचे वाटपबाबत आदेश दिले आहेत. सर्व बँका, पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. विविध प्रकारच्या विमानळ, पोर्टसाठी उपाययोजना केले जात आहेत.
प्रश्न : यापूर्वीच्या निवडणुकीत दुबार मतदान झाले आणि निवडणूक आयोगाची चूक होती हे मान्य करता का?
उत्तर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मी भाष्य करणार नाही.
प्रश्न : सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घेतली होती. त्यांनी काही मागण्या करत निवेदन दिलं होतं. त्याबाबत काय कारवाई केली?
उत्तर : सर्वपक्षीय शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. त्यावेळेस त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या हिशोबाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे 1 जुलै ते 15 ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या मतदार यादी मागितली आहे. मात्र त्याबाबत कुठल्याही प्रकारचं संभाषण केंद्रीय निवडणूक आयोगासोबत झालेलं नाही. सर्वपक्षीय बैठकीबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला मतमोजणी, वाचा संपूर्ण कार्यक्रम
प्रश्न : लोकांचा विश्वास आहे, पण मतादारांचा प्रचंड रोष आहे, त्यांची नावे गाळली आहेत किंवा दुबार आलेली आहेत. आपण सुप्रीम कोर्टाकडे निवडणूक ढकलण्यासाठी का विनंती केली नाही?
उत्तर : सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रश्न : दुबार मतदारांची संख्या माहिती आहे का?
उत्तर : दुबार म्हणजे ते संभाव्य दुबार आहेत. आमचे कर्मचारी त्यांच्या पर्यंत जातील त्यावेळेस तो दुबार आहे हे कळेल. त्यामुळे ही संख्या आता सांगता येणार नाही. ज्यावेळेस संभाव्य दुबार मतदार व्हेरिफाय करु त्यावेळेस संख्या समजेल.
प्रश्न : आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांनी दुबार मतदारांचे पुरावे दाखवले. ही नेमकी चूक कुणाची?
उत्तर : आता मतदार यादी ही आम्हाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आहे. आम्ही दुबार मतदार ओळखले आहेत. आणि नवी मतदार यादी आम्ही शेअर केली आहे आहे.
प्रश्न : सुलभ शौचालय आणि आयुक्तांच्या घरातील मतदारांची नावे आहेत. मग त्याला जबाबदार कोण? यावर तुमचा वचक नाही का?
उत्तर : आम्ही फक्त मतदार यादी अॅडॉप्ट करतो. आम्ही दुबार मतदार आहेत का, प्रभाग बदलला आहे का ते पाहतो. प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी आहे. राज्य निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत, केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत. कोणत्याही पक्षावर अन्याय होणार नाही. कोणत्याही मतदारावर अन्याय होणार नाही. मतदारांची तपासणी होत आहे. पोलिंग स्तरावर तपासणी होते.
EVM आणि VVPATच्या प्रश्नावर निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
EVM हे देशात 2005 पासून आहे. अनेक न्याायलयांमध्ये आव्हान देण्यात आलं. पण कुठेही त्या विरोधात निर्णय आलेला नाही, असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्तांनी दिलं. तसेच “VVPAT ची आपल्या कुठल्याच अधिनियमात नाही. काही तुरळक स्थानिक स्वराज्य संस्था सोडून मल्टी मेंबर संस्था आहे. अशा यंत्रणेसाठी VVPAT ची व्यवस्था नाही. त्यामुळे या निवडणुकीत आपण VVPAT चा वापर करणार नाही”, असंदेखील स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा
