• Thu. Jun 18th, 2026

    Mumbai Satyacha Morcha : महाविकास आघाडी अन् मनसेचा सर्वात मोठा मोर्चा; विरोधकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

    Mumbai Satyacha Morcha : महाविकास आघाडी अन् मनसेचा सर्वात मोठा मोर्चा; विरोधकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

    Mumbai Satyacha Morcha : निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे.

    मुंबई सत्याचा मोर्चा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईत आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात आला आहे. सत्याचा मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलंय. या मोर्चाला उद्धव ठाकरे , राज ठाकरे , आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित आहेत.

    निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील गैरव्यवहार याबाबत मनसे आणि महाविकास आघाडीकडून सगळ्यात मोठा ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला आहे. लोकांना सत्य कळावं आणि असत्य जनतेसमोर यावं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मोर्चा दुपारी 1 वाजता मुंबईतील फॅशन स्ट्रिटवरून सुरू झाला आहे. मेट्रो सिनेमामार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबेल. दरम्यान, राज ठाकरे मोर्चात सहभागी होण्यासाठी चर्चगेटला लोकलने प्रवास करत पोहोचले आहेत. त्यानंतर ते तिथे एका हॉटेलमध्ये थांबले होते.

    Maharashtra TimesMaharashtra Rain : राज्यात हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

    विरोधकांच्या मागण्या काय?

    1. सात नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करा.

    2. मतदारयाद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा.

    3. मतदारयाद्यांतील दुबार नावे काढा.

    4. मतदारयाद्या अद्ययावत करा.

    मोर्चाचा मार्ग कसा?

    दुपारी एक वाजता हा मोर्चा फॅशन स्ट्रीट इथून निघाला आहे आणि पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयाकडे जाईल. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इथे स्टेज उभारण्यात आला आहे, या ठिकाणी प्रत्येक पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होतील. ज्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात व इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होतील.

    Maharashtra Timesसंजय राऊत यांची प्रकृती बिघडली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन, म्हणाले संजयजी तुम्ही…

    राज्य निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात हा विराट मोर्चा आहे. मतचोरी, दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ या सगळ्यांचे पुरावे राज्य निवडणूक आयोगाला देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोग एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम जाहीर करत असताना जोपर्यंत मतदार याद्या अपडेट केला जात नाहीत आणि हा घोळ संपूर्णपणे दूर केला जात नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, या मतावर विरोधक ठाम राहणार आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा