Sanjay Shirsat on Satyacha Morcha: मुंबईत ‘सत्याचा विराट मोर्चा’वरून राजकीय वातावरण तापले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोर्चाला आमचा विरोध नाही, पण…
शिरसाट म्हणाले, “बोगस मतदार याद्या आहेत हे सर्वांना मान्य आहे. त्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण याच्या नावाखाली मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन करायचं आणि मुंबईला ठप्प करायचं, हे योग्य नाही. मोर्चाला आमचा विरोध नाही, पण नागरिकांना वेठीस धरू नका.” त्यांनी पुढे म्हटलं की, “हे सगळं निवडणुकीसाठी स्टंटबाजी आहे. निवडणूक आयोगाला भेटल्यानंतरही हे पुन्हा मोर्चा काढतायत, म्हणजे हा प्रचाराचा भागच आहे. यादीतील घोळ नक्कीच दूर झाले पाहिजेत, पण मोर्चा हा फक्त राजकीय शोभेचा भाग बनलाय.”
Raj Thackeray : आय लव्ह यू राज साहेब! दादर स्टेशनवर ऑटोग्राफ घेत तरुणाचे उत्स्फूर्त शब्द, राज ठाकरेंची प्रतिक्रिया काय?
चित भी मेरी, पट भी मे
राज ठाकरे यांच्या उपस्थितीवरून शिरसाट यांनी मविआला टोला लगावला, “राज साहेबांची एन्ट्री ही महाविकास आघाडीत फूट पाडणारी आहे. काँग्रेससोबत ते जाऊ शकत नाहीत. एकाच भाकरीचे किती तुकडे करणार? ‘चित भी मेरी, पट भी मेरी’ असं राजकारण चालणार नाही.” बोगस मतदार याद्यांबाबत शिरसाठ यांनी सांगितलं, “आमच्या जिल्ह्यात बोगस नावांची तपासणी करण्यासाठी कमिट्या स्थापन केल्या आहेत. कुणालाही शंका असल्यास तक्रार करावी, सर्वेक्षण केलं जातं आणि नावं आढळली तर कमी केली जातात. निवडणूक आयोग स्वायत्त आहे, कुणाच्या बोलण्यावर चालत नाही.”
अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकांवरही त्यांनी मत व्यक्त केलं. “अजित दादा स्पष्ट बोलतात, बॅलन्स भूमिका घेतात, राज्य पुढं न्यायचा प्रयत्न करतात. त्यावर आमचं काही मत नाही,” असं ते म्हणाले. तर चंद्रकांत पाटील यांच्याबाबत ते म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आमच्याकडेच आहे. चंद्रकांत दादांनी इकडे-तिकडे पाहू नये.” आगामी निवडणुकांबाबत ते म्हणाले, “निवडणूक लवकरच जाहीर होईल. पक्षाला याची पूर्ण जाणीव आहे.”
रायगड, शिवनेरी, राजगडावर नमो टुरिझम सेंटर, राज ठाकरे एकनाथ शिंदेंवर संतापले
उद्धव ठाकरेंचा मराठवादा दौरा
उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौर्यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले, “उद्धवजी येत आहेत, ते चांगलंच आहे. पण तीन दिवसांत किती लोकांशी संवाद साधतात, ते पाहावं लागेल. दोन मिनिटे शेतकरी, दहा मिनिटे कार्यकर्ते, असं असतं. पक्ष उरला नाही तर संवाद कुणाशी साधणार?

