Jalna accident : अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतमजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ऊसतोडीला जात असताना एका सात वर्षीय मुलाचा भरधाव गाडीच्या धडकेत मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील टाकळी बाजळ येथील एका कष्टकरी शेतमजुराच्या वाट्याला आज खूप मोठं दुःख आल्याची घटना घडली आहे. विलास जगताप हा शेतमजूर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह विदर्भातील मेहेकर याठिकाणच्या एका कारखान्यात कामासाठी जात होता. यावेळी त्यांच्याबरोब असलेला त्यांचा मुलगा सात वर्षीय सक्षमही सोबत होता. पण यावेळी झालेल्या अपघातात सक्षमला एका भरधाव एरटिगा गाडीने जोराची धडक दिली व त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
मोठी बातमी: फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, महिला आयपीएस अधिकारी करणार तपास
ही धडक एवढी खतरनाक होती की रस्त्यावर 25 ते 30 फूट सक्षम जगताप फरफटत गेला आणि यात गंभीर जखमी होऊन सक्षमने या जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे सक्षम जगताप या सात वर्षीय चिमुकल्याचा कालच वाढदिवस झाला आणि आज त्याच्यावर काळाने घाला घातल्याने संपूर्ण जालना जिल्ह्यात शोक काळा पसरली आहे. सदर अपघाताची माहिती मिळताच पँथर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संदीप खरात, वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालयात धाव घेतली व त्या परिवाराचे सांत्वन करत प्रशासनावर व कारखाना प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. हा बळी कारखान्याने व त्या ठिकाणी असलेल्या संबंधित ठेकेदारांनी घेतल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला आहे.
तर याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांच्या डोळ्यात अश्रू आले व त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे, की नको ती घटना झाली आहे, कारण कालच या चिमुकल्याचा वाढदिवस झाला आणि आज त्याने या जगाचा निरोप घेतला अशी घटना व्हायला नको पाहिजे होती, असे म्हणत त्यांनी सदर घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध केला आहे. तर पॅंथर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष संदीप खरात यांनी सुद्धा या प्रकरणाची कसून चौकशी पोलीस प्रशासनाने करावी व संबंधित कारचालकावर योग्य ती कारवाई करून या परिवाराला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

