Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये दिवाळीच्या उत्साहात एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या संजय भील यांचा एकुलता एक १५ वर्षीय मुलगा गणेशचा अपघातात मृत्यू झाला आहे.
नंदुरबार शहरातील शबरीहट्टी परिसरात भिल कुटुंबीय वीट भट्टीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. मात्र आपल्या मुलाने शिकून मोठे व्हावे. यासाठी त्याला घरापासून लांब नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील वस्तीगृहात शिक्षणासाठी पाठवले होते. दिवाळीची सुट्टी असल्याने तो नंदुरबार येथे परतला. सुट्यांमध्ये अस्तंबा यात्रेसाठी गेला होता. मात्र परतताना ज्या वाहनात बसला होता, त्याचा भीषण अपघात झाल्याने एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 18 ऑक्टोंबर रोजी घडली आहे.
Raj Thackeray : राज ठाकरेंनी फोडला मोठा बॉम्ब, महाराष्ट्रातील खोट्या मतदारांचा जाहीरपणे सांगितला आकडा, मुंबईतच…
नंदुरबार शहरातील शबरीहट्टी परिसरात राहणाऱ्या संजय भिल हे एका वीट भट्ट्यावर कुटुंबासमवेत मजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. एकुलता एक मुलाने शिकून मोठे व्हावे यासाठी नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वस्तीगृहात त्याला शिक्षणासाठी पाठवले होते. दिवाळीची सुट्टी लागल्याने गणेश संजय भिल (१५) हा नंदुरबार येथे आला होता.
सुट्टी असल्याने तो सातपुड्यातील प्रसिद्ध अशा अश्वत्थामा यात्रेसाठी गेला. तेथे दर्शन घेतल्यानंतर तो गावी येण्यासाठी निघाला होता. त्यादरम्यान तो 18 ऑक्टोंबर रोजी सकाळी पिकअप (क्र. एम-39-ए.बी-2802) या वाहनात बसला. हे वाहन चांदसैली घाट उतरत असताना सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या वाहनाचा भीषण अपघात झाला.
या अपघातात एकुलता एक असलेला मुलगा गणेश याच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला. मुलाने शिकून मोठे व्हावे अशी अपेक्षा असताना नियतीला काही वेगळेच मंजूर होते. त्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न अपूर्णच राहिले.
हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!
या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. तर 25 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात अर्जुन चुनीलाल सोनवणे रा. तळोदा यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक विलास हिरामण देसले रा. वैजाली ता. शहादा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

