• Tue. Jul 7th, 2026

    ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Oct 16, 2025
    ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत – महासंवाद




    मुंबई, दि. 16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ‘सणासुदीच्या काळात अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची सतर्कता’ या विषयावर अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

    दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 21, बुधवार, 22, आणि गुरूवार 23 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार,  21 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

    Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

    YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

    राज्यातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग सतत कार्यरत असून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विभागामार्फत अन्नसुरक्षेच्या विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. सणांच्या काळात मिठाई, नमकीन, तेल, दूध, पेय पदार्थ, मसाले आदी खाद्यपदार्थांची मागणी वाढत असते. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली असून, राज्यभरातील मिठाई तयार करणाऱ्या व विकणाऱ्या आस्थापनांची तपासणी सुरू आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अन्न नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. गुणवत्ताहीन, कालबाह्य किंवा भेसळ केलेले पदार्थ विक्रीस ठेवणाऱ्या आस्थापनांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. याचबरोबर औषध विक्री केंद्रे, घाऊक वितरक तसेच ऑनलाईन विक्री करण्याऱ्यांवर देखरेख ठेवली जात आहे. नकली, कालबाह्य किंवा परवानगीशिवाय विक्री होणाऱ्या औषधांसंदर्भात कठोर पावले उचलली जात आहेत. राज्यभर ‘स्वच्छ व सुरक्षित अन्न आपली जबाबदारी’ जनजागृती उपक्रमही राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांची अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती मंत्री झिरवाळ यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात दिली आहे.

    000

    जयश्री कोल्हे/स.सं







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed