• Mon. Mar 9th, 2026

    Jalna News : गाय गाळात रूतल्याने भाऊसाहेबांनी पाण्यात उतरत वाचवलं, पण… दिवाळीच्या तोंडावर वाईट घडलं, जालनामध्ये हळहळ

    Jalna News : गाय गाळात रूतल्याने भाऊसाहेबांनी पाण्यात उतरत वाचवलं, पण… दिवाळीच्या तोंडावर वाईट घडलं, जालनामध्ये हळहळ

    Bhokardan News : दिवाळीच्या तोंडावर एक धक्कादायक घटना घडली आहे. तलावामध्ये आपली गाय गाळात अडकलेली पाहून दिव्यांग भाऊसाहेबांनी तिला वाचवण्यासाठी उतरले, गाय वाचली पण त्यांना आपले प्राण गमवावे लागले. नेमकं काय झालं? जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा येथे गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात दिव्यांग शेतकऱ्याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटने विषयी सविस्तर माहिती अशी की रविवार, 12 ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यातील पळसखेडा बेचिराख येथील भाऊसाहेब बाबुराव जाधव, (55 वर्ष), रा. पळसखेडा बेचिराग ता. भोकरदन हे दुपारी 4 वाजता आपल्याजवळील पाळीव जनावरे चरण्यासाठी शेतातील बांधावर सोडली होती. त्यावेळी एक गाय त्यांच्या शेतापासून जवळच असलेल्या पाझर तलावात पाणी प्यायला गेली, यावेळी तलावाच्या कडेला मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला होता पाणी पिण्याच्या गडबडीमध्ये गाय थेट गाळात जाऊन फसली.

    भाऊसाहेब जाधव यांनी हे पाहिल्यावर तेव्हा कुठलाही वेळ वाया न घालवता तात्काळ तलावाच्या दिशेने धाव घेतली. आपल्या लाडक्या गाईला वाचवण्याचा प्रयत्न ते करू लागले यावेळी तलावाच्या कडेने ते जात असताना त्यांचा पाय घसरला. तलावात जाऊन पडले, अगोदरच त्यांना पोहोता येत नव्हते व त्यातल्या त्यात ते दिव्यांगसुद्धा होते. त्यामुळे तलावाच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडाले. बराच वेळ झाला गाई आसपासच्या शेतात इतर शेतकऱ्यांच्या शेतात चरायला लागल्या त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आधार तलावाकडे धाव घेतली व पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना भाऊसाहेब जाधव हे आढळून आले नाही आसपास पाहिले तरी सुद्धा सापडले नाही शेवटी पाझर तलावात ते आढळून आले याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ भोकरदन येथील पोलिसांना व अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
    Maharashtra Times‘माझ्या रस्त्यावर ट्रॅक्टर कसा आणलास?’ जुन्या भांडणातून पेटला वाद अन् लोखंडी रॉडने क्षणातच…
    घटनास्थळी येत एक ते दीड तास अथांग प्रयत्न करत शेतकऱ्यांच्या मदतीने मयत भाऊसाहेब जाधव यांचा मृतदेह वर काढला व भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गाय वाचली मात्र दिव्यांग शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. या घटनेची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे . याप्रसंगी अग्निशमन दलाचे राईस कादरी,आपत्ती व्यवस्थापनचे सुनील दळवी, टेकाळे आदी कर्मचारी उपस्थित होते. भाऊसाहेब जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा