Bhokardan News : दिवाळीच्या तोंडावर एक धक्कादायक घटना घडली आहे. तलावामध्ये आपली गाय गाळात अडकलेली पाहून दिव्यांग भाऊसाहेबांनी तिला वाचवण्यासाठी उतरले, गाय वाचली पण त्यांना आपले प्राण गमवावे लागले. नेमकं काय झालं? जाणून घ्या.
भाऊसाहेब जाधव यांनी हे पाहिल्यावर तेव्हा कुठलाही वेळ वाया न घालवता तात्काळ तलावाच्या दिशेने धाव घेतली. आपल्या लाडक्या गाईला वाचवण्याचा प्रयत्न ते करू लागले यावेळी तलावाच्या कडेने ते जात असताना त्यांचा पाय घसरला. तलावात जाऊन पडले, अगोदरच त्यांना पोहोता येत नव्हते व त्यातल्या त्यात ते दिव्यांगसुद्धा होते. त्यामुळे तलावाच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले आणि बुडाले. बराच वेळ झाला गाई आसपासच्या शेतात इतर शेतकऱ्यांच्या शेतात चरायला लागल्या त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आधार तलावाकडे धाव घेतली व पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना भाऊसाहेब जाधव हे आढळून आले नाही आसपास पाहिले तरी सुद्धा सापडले नाही शेवटी पाझर तलावात ते आढळून आले याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ भोकरदन येथील पोलिसांना व अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.
‘माझ्या रस्त्यावर ट्रॅक्टर कसा आणलास?’ जुन्या भांडणातून पेटला वाद अन् लोखंडी रॉडने क्षणातच…
घटनास्थळी येत एक ते दीड तास अथांग प्रयत्न करत शेतकऱ्यांच्या मदतीने मयत भाऊसाहेब जाधव यांचा मृतदेह वर काढला व भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गाय वाचली मात्र दिव्यांग शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली. या घटनेची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे . याप्रसंगी अग्निशमन दलाचे राईस कादरी,आपत्ती व्यवस्थापनचे सुनील दळवी, टेकाळे आदी कर्मचारी उपस्थित होते. भाऊसाहेब जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

