Jalna Man Electric Shock Death: जालना जिल्ह्यातील शिरनेर येथे वीज दुरुस्ती करताना विजेचा धक्का लागून अर्जुन खरात (३२) या सालगडी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाळ्यामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असताना, शेतात खांबाजवळ तपासणी करताना हा अपघात घडला.
वायर दुरुस्त करायला शेतात गेला अन्
शिरनेर गावातील माजी सरपंच बाबासाहेब नेहाजी गायके यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणारा अर्जुन भिमराव खरात (वय 32, रा. शिरनेर, जि. जालना) हा तरुण आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह त्याच कामावर चालवत होता. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास शेजाऱ्याच्या घरातील लाईट बंद झाल्याने अर्जुन वायर दुरुस्त करण्यासाठी शेतात असलेल्या खांबाजवळ गेला.
अहिल्यानगरमध्ये 22 वर्षीय अमोलने मृत्यूला कवटाळलं; एका ओळीच्या चिठ्ठीतून कारणाचा उलगडा, आता आपल्या…
हातात पक्कड आणि जमीन ओली
त्याच्या हातात पक्कड होती आणि खालील जमीन पावसामुळे ओली झाली होती. वीजपुरवठा का होत नाही हे पाहण्यासाठी अर्जुनने वायर हातात घेतला आणि त्याच क्षणी विजेचा तीव्र धक्का बसल्याने तो खाली पडला. त्या ठिकाणीच त्याचा मृत्यू झाला.
परिवार कोसळला दु: खाचा डोंगर
संपूर्ण रात्र निघून गेली तरी अर्जुन खरात घरी का आला ह्याचा विचार करून आसपासच्या शेजाऱ्यांनी व कुटुंबियांनी परिसरात पाहणी केली असता यावेळी विजेच्या खांबाजवळ अर्जुन खरात पडलेला आढळून आला. क्षणात ही बातमी गावभर पसरली. अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडके आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अर्जुनला अंबड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे खरात परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अर्जुनच्या पत्नीने आणि दोन लहान मुलांनी हंबरडा फोडला. कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा आधारच हरपला आहे. “आता मुलांचं काय होणार?” हा प्रश्न गावकऱ्यांनाही व्यथित करतोय.
आगामी निवडणुका, बारामतीतील भ्रष्टाचार, दिवाळी पाडवा ते अजितदादांची भेट; युगेंद्र पवारांची उत्तरं!
या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

